शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूकदारांचा जीव धोक्यात

By admin | Updated: November 27, 2014 23:39 IST

कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ता कामावर खर्च होत असला तरी रस्त्याची दुरवस्था संपत नसल्याचेच दिसते़ दररोज होणारे अपघात कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे; पण कुंभकर्णी झोपेत

आकोली : कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ता कामावर खर्च होत असला तरी रस्त्याची दुरवस्था संपत नसल्याचेच दिसते़ दररोज होणारे अपघात कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे; पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधित विभागाला जाग येताना दिसत नाही़ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी सामान्यांतून करण्यात येत आहे़वर्धा ते आर्वी हा जिल्हा मार्ग मरणवाट ठरत आहे़ या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका अपघाताची प्रतीक्षा करताना दिसते़ सुकळी (बाई) टी-पाँईट जवळील खड्ड्याने तर अनेकांना दवाखान्याचा रस्ता दाखविला़ पिपरी गावाजवळील खड्ड्याला खड्डा म्हणावे की महाखड्डा, हेच वाहनचालकांना कळत नाही. वारेमाप पैशांची उधळण करूनही रस्त्याचे हाल जैसे थे आहे. शासनाच्या निधीतून अधिकारी मालामाल झालेत, कत्राटदार कुबेर बनलेत, शासनाची तिजोरी रिकामी झाली; पण रस्ते सुस्थितीत आले नाहीत़ वाहन चालविताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या कुरण ठरले आहे़ संबंधित विभागाचे अधिकारी वातानुकूलित कक्षातून बाहेर पडायला तयार नसल्याचेच दिसते़जिल्हा मार्गाची अत्यंत दुरवस्था असून ग्रामीण भागातील रस्तेही मरणाला स्वस्त झाले आहेत़ पाय ठेवाल तेथे खड्डा दिसतो़ डांबर-गिट्टी नावालाही शिल्लक नसलेले रस्ते पाहायचे असेल तर अधिकाऱ्यांनी आकोली ते आंजी (मोठी) रस्त्यावरून फेरफटका मारला पाहिजे़ मुख्य मार्ग असलेल्या आर्वी ते वर्धा दरम्यान खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत़ या मार्गाने वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असून प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे़ रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्रामस्थांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते़ सार्वजनिक बांधकाम विभागाने या जिल्हा मार्गाच्या दुरूस्तीचा मुहूर्त काढून ग्रामस्थांना उपकृत करावे, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)