शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

खड्डेमय रस्त्यामुळे अपघात, कुटुंब उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:49 IST

पावसामुळे खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याची चाळणी झाली आहे. दुतर्फा बाभुळ झुडपाने वेढा घातला आहे. यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहने जात नाहीत.

ठळक मुद्देनागरिकांत आक्रोष : मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : पावसामुळे खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याची चाळणी झाली आहे. दुतर्फा बाभुळ झुडपाने वेढा घातला आहे. यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहने जात नाहीत. परिणामी, अपघातांत वाढ झाली आहे. अशाच एका अपघातात पती-पत्नी जखमी झाल्याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. दोन दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. यामुळे कार्यकारी अभियंत्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंतोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकरे यांनी केली आहे. याबाबत उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले.खडकी-अंतोरा-बेलोरा रस्ता क्र. ३३ वर ०/१०० ते १६/६०० किमी दरम्यान किन्हाळा ते खंबितपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या दुतर्फा बाभळीची झाडे वाढल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाही व अपघात होतात. माणिकनगर गावाजवळ एक मोठा खड्डा आहे. येथे अपघाताचे सातत्य आहे. माणिकनगर येथील ज्योती रवी गेडाम या पतीसह दुचाकीवर जात असताना खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कुटुंबाला आतापर्यंत उपचारासाठी १० लाख रुपये खर्च करावे लागले; पण अद्याप प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांचे पती रवी यांच्यावरही मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. एका खड्ड्यामुळे या कुटुंबाचा अख्खा संसार उघड्यावर आला. अंतोरा येथील अतुल वानखडे पत्नीसह मोर्शी येथे जात असताना याच खड्ड्यात पडले. यामुळे त्यांनाही गंभीर मार लागला. उपचारासाठी हजारो रुपये खर्च आला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी, उपविभाग आष्टी यांना निवेदन देण्यात आली; पण खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही. यामुळे दोषी व जबाबदार कार्यकारी अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, जखमींच्या कुटुंबियाना मदत द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. उपविभागीय अभियंता कार्यालयात निवेदन ठाकरेसह डॉ. नरेंद्र देशमुख, अरविंद पांडे, अनिल ठाकरे, अंकित मोहोड, मंगेश नागपूरे, राजेश नागपूरे, नामदेव लोखंडे उपस्थित होते.