शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार कारंजा (घा.) शेतमाल खरेदीसाठी सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही या भीतीमुळे ते १५ एप्रिलपर्यंत शेतमालाची अत्यंत कमी आवक झाली. या १५ दिवसाचे काळात चना ५४० क्विंटल गहू ४३१ क्विंटल तूर ७१९ क्विंटल आणि सोयाबीन २१४ क्विंटल येवढीच आवक झाली.

ठळक मुद्देशासकीयस्तरावरील खरेदी बंद । हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनतर्फे ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतमाल अद्याप शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे.लॉकडाऊनमुळे शेतमालाला भाव मिळणार नाही. शेतमालाची वाहतूक , मार्केट पर्यंत कशी करायची छोट्याशा घरात शेतमाल कशा आणि किती दिवस राखून ठेवायचा शेतीचा हंगाम आणि पेरणीचा काळ १ महिन्यावर येऊन ठेपला आहे. सरकारने शेतकऱ्यांची दुरावस्था व संकट लक्षात घेवून १ एप्रिल पासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व उपबाजार, काही अटीच्या आधीन राहून सुरू करण्यात आले आहे. आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार कारंजा (घा.) शेतमाल खरेदीसाठी सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही या भीतीमुळे ते १५ एप्रिलपर्यंत शेतमालाची अत्यंत कमी आवक झाली. या १५ दिवसाचे काळात चना ५४० क्विंटल गहू ४३१ क्विंटल तूर ७१९ क्विंटल आणि सोयाबीन २१४ क्विंटल येवढीच आवक झाली. तुरीचा हमीभाव ५८०० रू प्रतिक्विंटल असताना ५२०० ते ५४०० प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात आला. चनाचा हमीभाव ४६०० प्रति क्विंटल असतांना ३८०० रू प्रति क्विंटल तर सोयाबीनचा हमीभाव ३७१० रूपये असताना ३५०० ते ३५५० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे आणि गहू १६५० ते १८५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी केला. एकंदरीत प्रत्येक शेतमालाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने करण्यात आली. सरसकट शासनाचा नियमांची पायमल्ली होत आहे. तरीही कोणत्याही व्यापाऱ्यांवर कारवाई केली नाही. कारंजा कृषी उत्पन्न समिती उपबाजारात, शेतमाल खरेदीसाठी सक्षम असे ७ व्यापारी व १६ अडते आहेत. शेतमालाला कमी भाव मिळत असल्याबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही खरेदी केलेला माल ज्या मील मालकाना विकतो, तो मिलमालक, शेतमालाला हमीभावाएवढी किंमत देत नाही. म्हणून आमचा नाईलाज आहे. तसेच शेतमाल स्वच्छ करणे, वाहनामध्ये माल भरणे व मालकाकडे नेणे याकरीता जादा खर्च लागतो, अशी माहिती जेष्ठ व्यापारी इंद्रकुमार मोटवानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. आम्हीही शेतकरी आहोत. शेतकºयांच्या होत असलेल्या आर्थिक पिळवणूकीबद्दल आम्हालाही वाईट वाटते. पण उपाय नाही.शासनाने शासकीय खरेदी सुरू करणे हाच यावर उपाय आहे. शेतमाल काढण्याचा आणि विकण्याचा हंगाम जवळ संपत आला आहे. पण शासनाने तुर आणि चण्याची एफसीआयमार्फत शासकीय खरेदी अद्यापही सुरू केली नाही.कारंजात खरेदी केंद्र बंदच !कारंजा येथे १७० शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी तर तुर ६४६ शेतकऱ्यांनी तुर विक्रीसाठी खरेदी विक्री संघात, कागदपत्रासह नोंदणी केलेली आहे. पण अद्यापही शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. वर्धा धान्य भांडारापासून वर्धा-कारंजा व आष्टी अंतर ६० कि़मी.पेक्षा जास्त असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर ८ केंद्र मात्र सुरू झालेली आहेत. कापसाची विपनन महासंघाची शासकीय खरेदी करण्यासाठी कारंजा केंद्र सुरू करण्यात आले नाही. ते तातडीने सुरू करावे अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.एफसीआय व सीसीआयची खरेदी सुरू करावी असे पत्र संबंधीताना दिले आहे. बाजार समिती आष्टी व उपबाजार आवार कारंजा येथे शेतकऱ्यांनी मास्क बांधून यावे सोशल डिस्टन्सिंग राखावे अशा सुचना देण्यात आल्या असून हॅन्ड वॉश, पाण्याची व्यवस्था केली आहे. आवारात गर्दी होवू नये म्हणून दररोज एका व्यापाऱ्यांने ६० ते ७० क्विंटल माल खरेदी करावा अशी सुचना करण्यात आली आहे.- नंदकुमार वरकड, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड