शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रस्त्याअभावी शेतातच सडतोय शेतमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही.

ठळक मुद्देनिंबोली (शेंडे) येथील अडीचशे एकरांतील शेतकरी झाले कंगाल

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पहिल्याच वर्षी निम्न वर्धा धरण १०० टक्के भरण्याचा सर्वाधिक फटका आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या २५० एकरातील पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांचे बॅकवॉटरच्या पाण्याने वहिवाटीचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील कापूस, सोयाबीन, तूर शेतातच सडत असल्याचे विदारक वास्तव निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. आता जगावे कसे या विवंचनेत या गावातील शेतकरी सापडला आहे. सोयाबीनच्या गंज्या व कापूस शेतातच सडल्याने यावर्षीचा खरीप व रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या संकटाला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही. त्यामुळे आता करावे काय? व जगावे कसे या विवंचनेत निंबोली येथील शेतकरी सापडला आहे. या बॅक वॉटरच्या पाण्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस शेतातच सडत असल्याचे वास्तव आहे. यातही वहिवाटीचे मार्ग बंद आहे.रबी हंगामासाठी शेतच उरले नाही. शेतीसाठी रस्ता द्या नाही तर उर्वरित शेतजमीन ताब्यात घ्या, अशी मागणी शासनाकडे करीत आहे. येथील ४० शेतकऱ्यांचा २५० एकरांतील सर्व शेतमाल दहा अकरा फूट खोल पाण्यात सडत आहे. शेतात जायला रस्ताच नसल्याने येथील शेतीची कामेही ठप्प आहेत. शेतात पाणी असल्याने या परिसराला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही सोयाबीनच्या गंज्या सडत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणीच केली नाही. कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. पण शेतात जाता येत नाही. वहिवाटीचा रस्ताच नाही, मग शेतात जावे कसे?पाटबंधारे विभागाने रस्ता बनवून देण्यासाठी वहिवाट देण्याचे मान्य केले होते. मात्र, एक महिन्याचा कालावधी लोटूनही वहिवाटीचे मार्ग तयार न झाल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्ता तयार करून द्या नाहीतर जमीन घ्या, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्याअभावी या परिसरातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले. त्याची भरपाई कोण देणार? असा सवाल केला जात आहे. शासनाने उर्वरित जमीन घ्यावी अन्यथा वहिवाटीचा पक्का मार्ग द्यावा, अशी मागणी निंबोली (शेंडे) येथील शेतकºयांची आहे. या बॅकवॉटरने खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम मात्र पाण्यात गेल्याचे चित्र आहे.आठ एकरात कपाशी लागवड केली. गेल्या पंधरवड्यापासून शेतातील कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी मार्गच नाही. दहा फूट खोल पाणी रस्त्यात आहे. शेतात जावे कसे? संबंधित विभागाने पक्का रस्ता द्यावा अन्यथा आमची जमीन घ्यावी. शेतमालाच्या नुकसानीची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी.- अनिल काळे, शेतकरी, निंबोली (शेंडे).ता.आर्वी.अडीच एकरात रबी हंगामातील तूर आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. पाण्यातून मार्ग काढावा लागतो. यात पाण्यामुळे परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. आमच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार?- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता.आर्वी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी