शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी शेतातच सडतोय शेतमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही.

ठळक मुद्देनिंबोली (शेंडे) येथील अडीचशे एकरांतील शेतकरी झाले कंगाल

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पहिल्याच वर्षी निम्न वर्धा धरण १०० टक्के भरण्याचा सर्वाधिक फटका आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या २५० एकरातील पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांचे बॅकवॉटरच्या पाण्याने वहिवाटीचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील कापूस, सोयाबीन, तूर शेतातच सडत असल्याचे विदारक वास्तव निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. आता जगावे कसे या विवंचनेत या गावातील शेतकरी सापडला आहे. सोयाबीनच्या गंज्या व कापूस शेतातच सडल्याने यावर्षीचा खरीप व रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या संकटाला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही. त्यामुळे आता करावे काय? व जगावे कसे या विवंचनेत निंबोली येथील शेतकरी सापडला आहे. या बॅक वॉटरच्या पाण्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस शेतातच सडत असल्याचे वास्तव आहे. यातही वहिवाटीचे मार्ग बंद आहे.रबी हंगामासाठी शेतच उरले नाही. शेतीसाठी रस्ता द्या नाही तर उर्वरित शेतजमीन ताब्यात घ्या, अशी मागणी शासनाकडे करीत आहे. येथील ४० शेतकऱ्यांचा २५० एकरांतील सर्व शेतमाल दहा अकरा फूट खोल पाण्यात सडत आहे. शेतात जायला रस्ताच नसल्याने येथील शेतीची कामेही ठप्प आहेत. शेतात पाणी असल्याने या परिसराला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही सोयाबीनच्या गंज्या सडत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणीच केली नाही. कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. पण शेतात जाता येत नाही. वहिवाटीचा रस्ताच नाही, मग शेतात जावे कसे?पाटबंधारे विभागाने रस्ता बनवून देण्यासाठी वहिवाट देण्याचे मान्य केले होते. मात्र, एक महिन्याचा कालावधी लोटूनही वहिवाटीचे मार्ग तयार न झाल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्ता तयार करून द्या नाहीतर जमीन घ्या, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्याअभावी या परिसरातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले. त्याची भरपाई कोण देणार? असा सवाल केला जात आहे. शासनाने उर्वरित जमीन घ्यावी अन्यथा वहिवाटीचा पक्का मार्ग द्यावा, अशी मागणी निंबोली (शेंडे) येथील शेतकºयांची आहे. या बॅकवॉटरने खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम मात्र पाण्यात गेल्याचे चित्र आहे.आठ एकरात कपाशी लागवड केली. गेल्या पंधरवड्यापासून शेतातील कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी मार्गच नाही. दहा फूट खोल पाणी रस्त्यात आहे. शेतात जावे कसे? संबंधित विभागाने पक्का रस्ता द्यावा अन्यथा आमची जमीन घ्यावी. शेतमालाच्या नुकसानीची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी.- अनिल काळे, शेतकरी, निंबोली (शेंडे).ता.आर्वी.अडीच एकरात रबी हंगामातील तूर आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. पाण्यातून मार्ग काढावा लागतो. यात पाण्यामुळे परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. आमच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार?- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता.आर्वी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी