शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

रस्त्याअभावी शेतातच सडतोय शेतमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही.

ठळक मुद्देनिंबोली (शेंडे) येथील अडीचशे एकरांतील शेतकरी झाले कंगाल

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पहिल्याच वर्षी निम्न वर्धा धरण १०० टक्के भरण्याचा सर्वाधिक फटका आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या २५० एकरातील पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांचे बॅकवॉटरच्या पाण्याने वहिवाटीचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील कापूस, सोयाबीन, तूर शेतातच सडत असल्याचे विदारक वास्तव निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. आता जगावे कसे या विवंचनेत या गावातील शेतकरी सापडला आहे. सोयाबीनच्या गंज्या व कापूस शेतातच सडल्याने यावर्षीचा खरीप व रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या संकटाला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही. त्यामुळे आता करावे काय? व जगावे कसे या विवंचनेत निंबोली येथील शेतकरी सापडला आहे. या बॅक वॉटरच्या पाण्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस शेतातच सडत असल्याचे वास्तव आहे. यातही वहिवाटीचे मार्ग बंद आहे.रबी हंगामासाठी शेतच उरले नाही. शेतीसाठी रस्ता द्या नाही तर उर्वरित शेतजमीन ताब्यात घ्या, अशी मागणी शासनाकडे करीत आहे. येथील ४० शेतकऱ्यांचा २५० एकरांतील सर्व शेतमाल दहा अकरा फूट खोल पाण्यात सडत आहे. शेतात जायला रस्ताच नसल्याने येथील शेतीची कामेही ठप्प आहेत. शेतात पाणी असल्याने या परिसराला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही सोयाबीनच्या गंज्या सडत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणीच केली नाही. कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. पण शेतात जाता येत नाही. वहिवाटीचा रस्ताच नाही, मग शेतात जावे कसे?पाटबंधारे विभागाने रस्ता बनवून देण्यासाठी वहिवाट देण्याचे मान्य केले होते. मात्र, एक महिन्याचा कालावधी लोटूनही वहिवाटीचे मार्ग तयार न झाल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्ता तयार करून द्या नाहीतर जमीन घ्या, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्याअभावी या परिसरातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले. त्याची भरपाई कोण देणार? असा सवाल केला जात आहे. शासनाने उर्वरित जमीन घ्यावी अन्यथा वहिवाटीचा पक्का मार्ग द्यावा, अशी मागणी निंबोली (शेंडे) येथील शेतकºयांची आहे. या बॅकवॉटरने खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम मात्र पाण्यात गेल्याचे चित्र आहे.आठ एकरात कपाशी लागवड केली. गेल्या पंधरवड्यापासून शेतातील कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी मार्गच नाही. दहा फूट खोल पाणी रस्त्यात आहे. शेतात जावे कसे? संबंधित विभागाने पक्का रस्ता द्यावा अन्यथा आमची जमीन घ्यावी. शेतमालाच्या नुकसानीची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी.- अनिल काळे, शेतकरी, निंबोली (शेंडे).ता.आर्वी.अडीच एकरात रबी हंगामातील तूर आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. पाण्यातून मार्ग काढावा लागतो. यात पाण्यामुळे परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. आमच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार?- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता.आर्वी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी