शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानामुळे शेताचे झाले तळे

By admin | Updated: September 7, 2015 02:09 IST

राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे.

शेतातील माती टाकली बांधावर : खड्डे पडल्यामुळे शेतात साचते पाणी; शेती राहिली पडिकविरूळ (आकाजी) : राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. सध्या पाणी साचत असल्याने शेताला तलावांचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.आर्वी तालुका कृषी विभागाने परिसरात जलयुक्त शिवार अभियान राबविले. यात शेतातील बांध, नाला खोलीकरण व बांध आदी कामे जेसीबीद्वारे केली; पण नियोजन नसल्याने अनेकांच्या शेतांचे नुकसान झाले. परिणामी, शेती पडिक राहिली. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी लीला सहदेव यांची मौजा विरूळ येथे पाच ते सहा एकर शेती आहे. या शेतात कुणालाही न विचारता कृषी विभागाने शेतातील बांध जेसीबीने खोदला. शेतातील माती खोदून धुऱ्यावर टाकली. यामुळे शेतात खड्डे पडले. परिणामी, पाऊस आल्यास शेताला तलावाचे स्वरूप येते. शेतात पाणी साचल्याने यंदा पेरणी करता आली नाही व शेती पडिक राहिली. याबाबत त्यांनी कृषी सहायक राठोड व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; पण कुठलेही उत्तर मिळाले नाही. शेताच्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून लीला सहदेव व कुटुंबीय शासकीय कार्यालयाच्या चकरा मारत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)