शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
6
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
7
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
8
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
9
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
10
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
11
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
12
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
13
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
14
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
15
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
16
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
17
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
18
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
19
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
20
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  

जलयुक्त शिवार अभियानामुळे शेताचे झाले तळे

By admin | Updated: September 7, 2015 02:09 IST

राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे.

शेतातील माती टाकली बांधावर : खड्डे पडल्यामुळे शेतात साचते पाणी; शेती राहिली पडिकविरूळ (आकाजी) : राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. सध्या पाणी साचत असल्याने शेताला तलावांचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.आर्वी तालुका कृषी विभागाने परिसरात जलयुक्त शिवार अभियान राबविले. यात शेतातील बांध, नाला खोलीकरण व बांध आदी कामे जेसीबीद्वारे केली; पण नियोजन नसल्याने अनेकांच्या शेतांचे नुकसान झाले. परिणामी, शेती पडिक राहिली. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी लीला सहदेव यांची मौजा विरूळ येथे पाच ते सहा एकर शेती आहे. या शेतात कुणालाही न विचारता कृषी विभागाने शेतातील बांध जेसीबीने खोदला. शेतातील माती खोदून धुऱ्यावर टाकली. यामुळे शेतात खड्डे पडले. परिणामी, पाऊस आल्यास शेताला तलावाचे स्वरूप येते. शेतात पाणी साचल्याने यंदा पेरणी करता आली नाही व शेती पडिक राहिली. याबाबत त्यांनी कृषी सहायक राठोड व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; पण कुठलेही उत्तर मिळाले नाही. शेताच्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून लीला सहदेव व कुटुंबीय शासकीय कार्यालयाच्या चकरा मारत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)