शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

जलयुक्त शिवार अभियानामुळे शेताचे झाले तळे

By admin | Updated: September 7, 2015 02:09 IST

राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे.

शेतातील माती टाकली बांधावर : खड्डे पडल्यामुळे शेतात साचते पाणी; शेती राहिली पडिकविरूळ (आकाजी) : राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोमाने राबविले जात आहे; पण कृषी विभाग यात नियोजनबद्ध काम करीत नसल्याने शेतकऱ्यांवर शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. सध्या पाणी साचत असल्याने शेताला तलावांचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.आर्वी तालुका कृषी विभागाने परिसरात जलयुक्त शिवार अभियान राबविले. यात शेतातील बांध, नाला खोलीकरण व बांध आदी कामे जेसीबीद्वारे केली; पण नियोजन नसल्याने अनेकांच्या शेतांचे नुकसान झाले. परिणामी, शेती पडिक राहिली. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी लीला सहदेव यांची मौजा विरूळ येथे पाच ते सहा एकर शेती आहे. या शेतात कुणालाही न विचारता कृषी विभागाने शेतातील बांध जेसीबीने खोदला. शेतातील माती खोदून धुऱ्यावर टाकली. यामुळे शेतात खड्डे पडले. परिणामी, पाऊस आल्यास शेताला तलावाचे स्वरूप येते. शेतात पाणी साचल्याने यंदा पेरणी करता आली नाही व शेती पडिक राहिली. याबाबत त्यांनी कृषी सहायक राठोड व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; पण कुठलेही उत्तर मिळाले नाही. शेताच्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून लीला सहदेव व कुटुंबीय शासकीय कार्यालयाच्या चकरा मारत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)