शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रोजगार हिरावल्याने २५ कुटुंबांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:08 IST

खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली.

ठळक मुद्देखडकी मंदिरासमोरील दुकाने हटविली : संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली. परंतु, शासनाने त्यांना देऊ केलेला मोबदला जमीनमालकाच्या खोटारडेपणामुळे मिळण्यास विलंब होत असल्याने दुसरीकडे कुठे व्यवसाय उभा करायचा व त्याकरिता लागणारे भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न या लघु व्यावसायिकांना भेडसावत आहे. या सर्व हॉटेल व्यवसायिकांचा रोजगार हिरावण्यापूर्वी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यांना जागा उपलब्ध करुन द्यायची होती. परंतु, असे झाले नाही. त्यामुळे शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. सुमारे ४० वर्षापासून मोहम्मद मुमताज हबीब अन्सारी, जमील खान मोहम्मद युसूफ, गजानन रामाजी राऊत, ताहिर अली इनायत अली, मोहम्मद शकील खाान आदी व्यावसायिक किरायाच्या जागेवर हॉटेलचे शेड उभारून व्यवसाय करीत होते. मात्र, जागामालकाने ही सर्व दुकाने स्वत:चीच असल्याचे भासवून दुकानमालकाना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम स्वत:च हडपण्याचा डाव आखला होता. याची कुणकुण या व्यावसायिकांना लागताच यावर शासनाकडे आक्षेप घेतला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने नुकसान भरपाईचा मोबदला प्रलंबित आहे. जमीनमालकाने त्याच्या जागेवर असलेली वेगवेगळ्या व्यावसायिकांची दुकाने स्वत:चीच असल्याचे भासविण्याकरिता खडकीचा ग्रामसेवक, तलाठी यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे शासनाकडे सादर केल्याचा आरोप या सर्व व्यावसायिकांनी केला आहे. तसेच सेलूच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी चुकीचे मूल्यांकन केल्याचा आरोपही व्यावसायिकांनी केला आहे. या हॉटेलसोबत तेथील सिरादिननिसा इकबाल खान, शमसुनिसा इकबाल खान व शरफुनिसा शेख उस्मान यांची घरेसुद्धा या महामार्गात जात आहेत. त्यांचाही मोबदला अडकल्याचे सांगण्यात आले.शेतीचा वाढीव मोबदलाही मिळाला नाहीमहामार्गात गेलेल्या शेतात आंब्याची झाडे होती तसेच ओलिताची शेती कोरडवाहू दाखविण्यात आली होती. यात शेतकऱ्यांकडून दुरुस्तीची मागणी करण्यात आली. परंतु, त्याचा शासनाकडून अद्याप वाढीव मोबदला देण्यात आल्या नसल्याचा आरोप मुजाहिद आणि मोहम्मद अली यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.जमीन मालकाने पटवारी व ग्रामसेवक यांना हाताशी घेऊन व चिरीमिरीच्या मोहात बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. आमच्या मालकीचे हॉटेल, दुकान स्वत:चे असल्याचे सांगून प्रशासनाची दिशाभूल केली. आम्हाला मिळणारा हक्काचा नुकसानीच्या मोबदला हडपण्याचा प्रयत्न केला. याची सखोल चौकशी करण्यात यावी.- इकबाल खान, किरकोळ व्यावसायिक, खडकी (आ.)

टॅग्स :KhadkiखडकीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग