शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

रोजगार हिरावल्याने २५ कुटुंबांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:08 IST

खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली.

ठळक मुद्देखडकी मंदिरासमोरील दुकाने हटविली : संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली. परंतु, शासनाने त्यांना देऊ केलेला मोबदला जमीनमालकाच्या खोटारडेपणामुळे मिळण्यास विलंब होत असल्याने दुसरीकडे कुठे व्यवसाय उभा करायचा व त्याकरिता लागणारे भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न या लघु व्यावसायिकांना भेडसावत आहे. या सर्व हॉटेल व्यवसायिकांचा रोजगार हिरावण्यापूर्वी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यांना जागा उपलब्ध करुन द्यायची होती. परंतु, असे झाले नाही. त्यामुळे शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. सुमारे ४० वर्षापासून मोहम्मद मुमताज हबीब अन्सारी, जमील खान मोहम्मद युसूफ, गजानन रामाजी राऊत, ताहिर अली इनायत अली, मोहम्मद शकील खाान आदी व्यावसायिक किरायाच्या जागेवर हॉटेलचे शेड उभारून व्यवसाय करीत होते. मात्र, जागामालकाने ही सर्व दुकाने स्वत:चीच असल्याचे भासवून दुकानमालकाना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम स्वत:च हडपण्याचा डाव आखला होता. याची कुणकुण या व्यावसायिकांना लागताच यावर शासनाकडे आक्षेप घेतला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने नुकसान भरपाईचा मोबदला प्रलंबित आहे. जमीनमालकाने त्याच्या जागेवर असलेली वेगवेगळ्या व्यावसायिकांची दुकाने स्वत:चीच असल्याचे भासविण्याकरिता खडकीचा ग्रामसेवक, तलाठी यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे शासनाकडे सादर केल्याचा आरोप या सर्व व्यावसायिकांनी केला आहे. तसेच सेलूच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी चुकीचे मूल्यांकन केल्याचा आरोपही व्यावसायिकांनी केला आहे. या हॉटेलसोबत तेथील सिरादिननिसा इकबाल खान, शमसुनिसा इकबाल खान व शरफुनिसा शेख उस्मान यांची घरेसुद्धा या महामार्गात जात आहेत. त्यांचाही मोबदला अडकल्याचे सांगण्यात आले.शेतीचा वाढीव मोबदलाही मिळाला नाहीमहामार्गात गेलेल्या शेतात आंब्याची झाडे होती तसेच ओलिताची शेती कोरडवाहू दाखविण्यात आली होती. यात शेतकऱ्यांकडून दुरुस्तीची मागणी करण्यात आली. परंतु, त्याचा शासनाकडून अद्याप वाढीव मोबदला देण्यात आल्या नसल्याचा आरोप मुजाहिद आणि मोहम्मद अली यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.जमीन मालकाने पटवारी व ग्रामसेवक यांना हाताशी घेऊन व चिरीमिरीच्या मोहात बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. आमच्या मालकीचे हॉटेल, दुकान स्वत:चे असल्याचे सांगून प्रशासनाची दिशाभूल केली. आम्हाला मिळणारा हक्काचा नुकसानीच्या मोबदला हडपण्याचा प्रयत्न केला. याची सखोल चौकशी करण्यात यावी.- इकबाल खान, किरकोळ व्यावसायिक, खडकी (आ.)

टॅग्स :KhadkiखडकीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग