शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

रोजगार हिरावल्याने २५ कुटुंबांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:08 IST

खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली.

ठळक मुद्देखडकी मंदिरासमोरील दुकाने हटविली : संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली. परंतु, शासनाने त्यांना देऊ केलेला मोबदला जमीनमालकाच्या खोटारडेपणामुळे मिळण्यास विलंब होत असल्याने दुसरीकडे कुठे व्यवसाय उभा करायचा व त्याकरिता लागणारे भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न या लघु व्यावसायिकांना भेडसावत आहे. या सर्व हॉटेल व्यवसायिकांचा रोजगार हिरावण्यापूर्वी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यांना जागा उपलब्ध करुन द्यायची होती. परंतु, असे झाले नाही. त्यामुळे शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. सुमारे ४० वर्षापासून मोहम्मद मुमताज हबीब अन्सारी, जमील खान मोहम्मद युसूफ, गजानन रामाजी राऊत, ताहिर अली इनायत अली, मोहम्मद शकील खाान आदी व्यावसायिक किरायाच्या जागेवर हॉटेलचे शेड उभारून व्यवसाय करीत होते. मात्र, जागामालकाने ही सर्व दुकाने स्वत:चीच असल्याचे भासवून दुकानमालकाना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम स्वत:च हडपण्याचा डाव आखला होता. याची कुणकुण या व्यावसायिकांना लागताच यावर शासनाकडे आक्षेप घेतला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने नुकसान भरपाईचा मोबदला प्रलंबित आहे. जमीनमालकाने त्याच्या जागेवर असलेली वेगवेगळ्या व्यावसायिकांची दुकाने स्वत:चीच असल्याचे भासविण्याकरिता खडकीचा ग्रामसेवक, तलाठी यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे शासनाकडे सादर केल्याचा आरोप या सर्व व्यावसायिकांनी केला आहे. तसेच सेलूच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी चुकीचे मूल्यांकन केल्याचा आरोपही व्यावसायिकांनी केला आहे. या हॉटेलसोबत तेथील सिरादिननिसा इकबाल खान, शमसुनिसा इकबाल खान व शरफुनिसा शेख उस्मान यांची घरेसुद्धा या महामार्गात जात आहेत. त्यांचाही मोबदला अडकल्याचे सांगण्यात आले.शेतीचा वाढीव मोबदलाही मिळाला नाहीमहामार्गात गेलेल्या शेतात आंब्याची झाडे होती तसेच ओलिताची शेती कोरडवाहू दाखविण्यात आली होती. यात शेतकऱ्यांकडून दुरुस्तीची मागणी करण्यात आली. परंतु, त्याचा शासनाकडून अद्याप वाढीव मोबदला देण्यात आल्या नसल्याचा आरोप मुजाहिद आणि मोहम्मद अली यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.जमीन मालकाने पटवारी व ग्रामसेवक यांना हाताशी घेऊन व चिरीमिरीच्या मोहात बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. आमच्या मालकीचे हॉटेल, दुकान स्वत:चे असल्याचे सांगून प्रशासनाची दिशाभूल केली. आम्हाला मिळणारा हक्काचा नुकसानीच्या मोबदला हडपण्याचा प्रयत्न केला. याची सखोल चौकशी करण्यात यावी.- इकबाल खान, किरकोळ व्यावसायिक, खडकी (आ.)

टॅग्स :KhadkiखडकीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग