शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 20, 2014 23:42 IST

शेतात राबराब राबत असलेल्या बैलांच्या कर्जातून उतराई होण्याचा सण म्हणजे पोळा. अवघ्या चार ते पाच दिवसांवर तो येऊन ठेपला आहे. पण गत वर्षी ओला आणि या वर्षी कोरडा दुष्काळ पसरल्याने

वर्धा : शेतात राबराब राबत असलेल्या बैलांच्या कर्जातून उतराई होण्याचा सण म्हणजे पोळा. अवघ्या चार ते पाच दिवसांवर तो येऊन ठेपला आहे. पण गत वर्षी ओला आणि या वर्षी कोरडा दुष्काळ पसरल्याने सणातील उत्साहावर विरजण पडले आहे. त्यामुळे पोळा सणावरच अनुत्साही वातावरण असून दुष्काळाची गडद छाया पहावयास मिळत आहे.पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. बँका, सावकारांकडून कर्ज, उसनेपासने करत बी-बियाणे खरेदी करून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर वाकलेली पिके पाहण्याची वेळ आली आहे. पोळा सण साजरा करण्यासाठी उसणे अवसान बळीराजा आणत आहे. मात्र दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी महागाई वाढल्याने या सर्जा-राजाला कसे सजवावे, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.गतवर्षी जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. तर यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी शेतकऱ्यांची बैलांवरील निष्ठा कमी झालेली नाही. त्यामुळे पोळा हा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो. पण दुष्काळाचे सावट पसरल्याने चार दिवसावर सन आलेला असतानाही ग्राहकांअभावी बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पोळ्याला बैलाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकाने सजली आहेत. घुंगरू, रेशीम, घाटी, रंगीत झुल्या, मोरकी, वेसन, बाशिंग, गोंदे, कवडी यासह इतर साहित्यांनी दुकाने सजली आहेत, परंतु हे साहित्य खरेदीसाठी वर्दळ नसल्याने व्यापाऱ्यांत औदासिन्य पसरले आहे. त्यातच साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्यांचे दिसून येत आहे. बैलाच्या शिंगांना लावण्यात येणारे रंग, बेगड यांच्याही दरामध्ये गतवर्षीपेक्षा १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात घुंगरू ४०० रुपये, चंगाळ १०० ते १२० रुपये, रेशीम ११० ते १२०, मणिमाळ २० ते २५ रुपये, कासरा १०० ते १२०, कवडीमाळ १३० ते १५०, बाशिंग ६० ते ८०, गोंडे ११० ते १२५, मोरकी ४० ते ५० रुपये व झुलीचे भाव ९०० ते १५०० रुपये असा टप्पा गाठल्याने पोळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव दुष्काळी परिस्थितीत वाढल्याने यावर्षी पोळा सणातील शेतकऱ्यांचा उत्साह कमी दिसून येत आहे. बाशिंगाला मोठे महत्त्व असते पण त्याच्याही किमतीत वाढ झाल्याने काय खरेदी करावे, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. तीन ते चार वर्षापासून विविध मार्गांनी नैसर्गिक संकट येऊन शेतकरी देशोधडीला लागला आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. वस्तूंचे वाढलेले दर लक्षात घेता यावर्षीचा पोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा होणार आहे. आजही शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पण दोन चार शिरवे सोडले तर चांगला पाऊस यायला तयार नाही. संपूर्ण विदर्भात हे चित्र पाहावयास मिळत आहे. आपले वडील चिंतेत असल्याचे लहान मुलांलाही जाणवत आहे. बैलांनाही हे नक्कीच जानवत असणारच.(शहर प्रतिनिधी)