शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

अवमूल्यन आणि सरकीच्या भाववाढीनेच कापसात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 13:58 IST

शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यानंतर हंगाम संपत आल्यावर कापसाचे दर वाढत आहेत. सध्या बाजारात कापसाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत गेलेले आहे.

ठळक मुद्दे ६ हजार ५०० रुपयांवर गेले दर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यानंतर हंगाम संपत आल्यावर कापसाचे दर वाढत आहेत. सध्या बाजारात कापसाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत गेलेले आहे. ही भाववाढ केंद्र सरकारने हमीभाव वाढविल्याने झाली नाही, तर रुपयाचे सतत झालेले अवमूल्यन आणि सरकीच्या दरातील तेजीमुळे झालेली आहे, असे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मोदी सरकारने २०१८-१९ च्या हंगामासाठी कापसाचे हमीभाव ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलची घोषणा केली. मागीलवर्षीच्या २०१७-१८ च्या हंगामात कापसाचा हमीभाव ४ हजार ३६० रुपये होता. म्हणजेच प्रतिक्विंटल १ हजार ९० रुपये वाढ झालेली आहे. ही वाढ केवळ २४ टक्केच आहे. डॉ. मनमोहनसिंग सरकारने २००८-०९ हमीभाव २ हजार ३० रुपयांवरून ३ हजार रुपये प्रतिक्विंटल केला होता. ही वाढ ५० टक्के होती. हा दर त्या काळात देशातील व जागतिक बाजारपेठेतही मिळत नव्हता. सर्व कापूस केंद्रीय महामंडळ (सीसीआय) व नाफेडने खरेदी केला होता. आज मोदी सरकारला ५ हजार ४५० रुपये दराने कापूस खरेदी करावा लागत नाही. कारण बाजारात ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये दर आहेत. यावर्षी कापूस हंमाग सुरू झाला, तेव्हा कापसाचे दर ५ हजार ५०० रुपये ते ५ हजार ८०० रुपयांदरम्यान होते. मध्यंतरी ५ हजार २०० ते ५ हजार ४०० रुपये झाले होते. आज ते पुन्हा ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढले आहे. या तेजीचे मुख्य कारण रुपयाचे अवमूल्यन व सरकीच्या दरातील तेजी आहे. जागतिक बाजारात रुईच्या दरात तेजी नाही. मागच्या हंगामात ८० ते ९० सेंट प्रतिपाऊंड रुईचे भाव होते. आजही ८७ सेंट प्रतिपाऊंड रुईचा दर आहे. आज ७० रुपये प्रतिडॉलर हा विनिमय दर आहे. गतवर्षी ६२ रुपये प्रतिडॉलर विनिमय दर होता. अमेरिकेचा कापूस शेतकरी कमी दरात विकतो तरीही आत्महत्या करत नाही, कारण त्यांना ४.६ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळते. पण, आपल्याकडे तशी योजना नसल्याने आणि हंगाम संपल्यावर कापसाचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांचेच कंबरडे मोडत आहे. आताही ही भाव वाढ शेतकऱ्यांच्या नाही तर व्यापाऱ्यांच्या हिताची ठरली आहे.निर्यात घटली आणि आयात वाढलीमध्यंतरी अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध वाढले आणि भारतातून निर्यात वाढून दर वाढतील अशी चर्चा होती. परंतु, यंदा कापसाची निर्यात वाढली नसून कमी झाली तर आयात वाढली आहे. मागील वर्षी २० लाख गाठींची आयात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन २७ लाख गाठींची आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या दरावर याचा परिणाम होऊन पुढील हंगामातील हमीभावावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकीच्या भावात विक्रमी वाढीचे कारणसरकीचे भाव वाढल्यानेच आपल्याकडील कापसाला झळाळी आली आहे. पण, सरकीचे भाव अचानक वाढण्यामागे अमेरिकेतील मका पीक हे मुख्य कारण आहे. अमेरिकेतील मका पीक केसाळ अळीने नष्ट केले आहे. म्हणून सरकीच्या ढेपीच्या भावात वाढ झाली आहे. परिणामी, आपल्याकडील मक्याचे १ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असलेले भाव २ हजार रुपयांवर पोहोचले. तसेच ढेपीची मागणी वाढल्याने सरकीचे दरही वाढले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी रुपयाच्या अवमूल्यनाची निंदा करायचे; परंतु आज रुपयाच्या अवमूल्यनामुळे कापसाचे दर वाढून शेतकºयांना काहीसा लाभ मिळाला. हे अवमूल्यनच शेतकऱ्यांना तारक ठरले आहे. अवमूल्यनामुळे कापसाची आयात मर्यादित झाली. विशेषत: सरकार कापसावर आयात कर का लावत नाही? हाच मोठा प्रश्न आहे. कापसाची जर आयात कायम असती तर पुढील हंगामातही कापसाचे भाव कमी राहिले असते.- विजय जावंधिया,शेतकरी नेते

टॅग्स :Farmerशेतकरी