शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाच्या विलंबामुळे वैरण टंचाईचे सावट

By admin | Updated: June 25, 2014 23:57 IST

पावसाळा लागला पण पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेताच्या बांधावर उगवणारे गवत उगवलेच नसल्याने वैरण टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

घोराड : पावसाळा लागला पण पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेताच्या बांधावर उगवणारे गवत उगवलेच नसल्याने वैरण टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.रोहिणी नक्षत्रात येणारा रिमझिम पाऊस यंदा लांबला. मृग नक्षत्रही कोरडेच गेले. आर्द्रा नक्षत्राचे काही दिवस लोटले असताना चक्क लखलखाट दिसत आहे. उन्हाळयाच्या दिवसात जनावरांना लागणारा चारा शेतकऱ्यांजवळ होता, तो साठा आता संपत आला आहे. पावसाळ्यात जनावरांना हिरवाकंच चारा शेताच्या बांधावरच मिळतो पण या हंगामात पावसाने जवळपास तिनही नक्षत्र कोरडे असल्याची झलक दाखविली आहे.शेतात उन्हाळ्याच्या दिवसात असणारा कड्याळू पेरणीसाठी शेत सज्ज करताना कापल्या गेला. सोयाबीन पावसात ओलेचिंब झाल्याने सोयाबीनचे कुटार बेकार झाले होते. परिसरात शेंगदान्याचा पेरा कमी असल्याने यापासून मिळणारे कुटार नगण्य आहे. केळीच्या बागा नामशेष झाल्याने केळीची पानेही मिळेनासी झाले आहे. गहू पिकाची मळणी हार्वेस्टर यंत्राणे केली जात असल्याने यापासून मिळणारा गव्हांडा नाहिसा झाला आहे. शेतकऱ्यांजवळ असणाऱ्या जनावरांना पावसाळ्यात शेताच्या बांधावर उगवणाऱ्या गवताचा आधार असतो. आकाशात मेघ नाही. लख्ख तापणारी उन्ह शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरत आहे. पावसाच्या विलंबामुळे वैरण टंचाईचे सावट निर्माण झाल्याने जनावरे कशी जगवावी अशी चिंता शेतकरी वर्गाला पडली आहे. एकीकडे स्प्रिंकलरने ओलितासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा आणावा तरी कुठून असा प्रश्न वारंवार सतावत आहे.(वार्ताहर)