शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या विलंबामुळे वैरण टंचाईचे सावट

By admin | Updated: June 25, 2014 23:57 IST

पावसाळा लागला पण पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेताच्या बांधावर उगवणारे गवत उगवलेच नसल्याने वैरण टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

घोराड : पावसाळा लागला पण पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेताच्या बांधावर उगवणारे गवत उगवलेच नसल्याने वैरण टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.रोहिणी नक्षत्रात येणारा रिमझिम पाऊस यंदा लांबला. मृग नक्षत्रही कोरडेच गेले. आर्द्रा नक्षत्राचे काही दिवस लोटले असताना चक्क लखलखाट दिसत आहे. उन्हाळयाच्या दिवसात जनावरांना लागणारा चारा शेतकऱ्यांजवळ होता, तो साठा आता संपत आला आहे. पावसाळ्यात जनावरांना हिरवाकंच चारा शेताच्या बांधावरच मिळतो पण या हंगामात पावसाने जवळपास तिनही नक्षत्र कोरडे असल्याची झलक दाखविली आहे.शेतात उन्हाळ्याच्या दिवसात असणारा कड्याळू पेरणीसाठी शेत सज्ज करताना कापल्या गेला. सोयाबीन पावसात ओलेचिंब झाल्याने सोयाबीनचे कुटार बेकार झाले होते. परिसरात शेंगदान्याचा पेरा कमी असल्याने यापासून मिळणारे कुटार नगण्य आहे. केळीच्या बागा नामशेष झाल्याने केळीची पानेही मिळेनासी झाले आहे. गहू पिकाची मळणी हार्वेस्टर यंत्राणे केली जात असल्याने यापासून मिळणारा गव्हांडा नाहिसा झाला आहे. शेतकऱ्यांजवळ असणाऱ्या जनावरांना पावसाळ्यात शेताच्या बांधावर उगवणाऱ्या गवताचा आधार असतो. आकाशात मेघ नाही. लख्ख तापणारी उन्ह शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरत आहे. पावसाच्या विलंबामुळे वैरण टंचाईचे सावट निर्माण झाल्याने जनावरे कशी जगवावी अशी चिंता शेतकरी वर्गाला पडली आहे. एकीकडे स्प्रिंकलरने ओलितासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा आणावा तरी कुठून असा प्रश्न वारंवार सतावत आहे.(वार्ताहर)