शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाकाळीपासून येळाकेळीपर्यंत टाकली जाणार जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:37 IST

शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे तत्काळ कार्यवाहीचे निर्देश : भोयर यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. आ. भोयर यांनी याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी केली. शहर व लगतच्या १३ गावांमध्ये धाममधून पाणीपुरवठा करण्यात येतो.शहराला नगर परिषद तर १३ गावांना जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. येळाकेळी येथील पंपिंग स्टेशनवरून हा पाणीपुरवठा करण्यात येतो. महाकाली धरणातून पाणी सोडल्यानंतर ते येळाकेली येथील बंधाऱ्यावर अडविण्यात येते. परंतु, अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी धरणात जलसंचय कमी झाला. परिणामी, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. धरणाची उंची वाढविल्यास पाणी समस्या निकाली निघेल सोबतच शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी मिळेल. याबाबत पाठपुरावा करूनदेखील कार्यवाही झाली नाही. प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याने त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. उन्हाळ्यात महाकाळी जलाशयातून वर्धा व लगतच्या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात येते. अंतर अधिक असल्याने २५ टक्के पाणी केवळ येळाकेलीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. महाकाळीपासून येळाकेळीपर्यंत पाईपलाईन टाकल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच वर्ध्यासह लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणे सोईचे जाईल.