शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

सक्षम अर्थव्यवस्थेमुळे देशाची समृद्धीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:51 IST

देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. भारतात आगामी ३०-४० वर्षांत खूप परिवर्तन होणार आहे. भविष्य उज्ज्वल आहे. १९९२ पूर्वी आपली अर्थव्यवस्था ३६२ बिलियन डॉलर होती. आज २.८ एवढी ९ पटीने वाढलेली आहे. याचा लाभ या विद्यार्थी पिढीला होणार आहे. आगामी पाच-दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पुढे गेलेली असेल.

ठळक मुद्देसंडे अँकर । डॉ. संजीव कुमार, राणीबाई अग्निहोत्री स्मृतिदिनानिमित्त प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. भारतात आगामी ३०-४० वर्षांत खूप परिवर्तन होणार आहे. भविष्य उज्ज्वल आहे. १९९२ पूर्वी आपली अर्थव्यवस्था ३६२ बिलियन डॉलर होती. आज २.८ एवढी ९ पटीने वाढलेली आहे. याचा लाभ या विद्यार्थी पिढीला होणार आहे. आगामी पाच-दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पुढे गेलेली असेल. देशाची वाटचाल निश्चितच समृद्धीकडे असल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केले.जय महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूूशन्सद्वारे मातोश्री राणीबाई अग्निहोत्री स्मृतिदिनी संस्थांतर्गत शाळा व महाविद्यालयातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारोह अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, नागठाणा रोड, सिंदी (मेघे), येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री होते.डॉ. संजीव कुमार म्हणाले, सरकारचे आर्थिक धोरण हे सकारात्मक असून ५ त्रिलियन डॉलर करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने आपला देश विकसित होत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:वर, क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. स्वत:ला अपडेट करीत राहा. तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. आपल्याला येणाऱ्या काळात फार मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शंकरप्रसाद अग्निहोत्री म्हणाले, शिक्षण हे जीवनातील तत्त्व असले पाहिजे. शिक्षणाचे पहिले तत्त्व माहिती. माहितीशात्राच्या आधारे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानाच्या रूपाने आपली विचारधारा समर्थ बनविली पाहिजे. विचार सकारात्मक असले पाहिजे यातूनच समजदारी प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा बाळगली पाहिजे. विद्यार्थीदशेत आपली जिज्ञासा प्रबळ असेल तर ते संशोधन करण्याकडे मार्गक्रम होते. विद्यार्थ्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली पाहिजे.देशाला, समाजाला आपणाकडून काय देता येईल याचा विचार करावा. सत्याचे अनुष्ठान करा. आपल्या उद्देशपूर्तीसाठी कार्य करा. जो त्याग करेल, तोच पुजला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. सोबतच एजीआयचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचारण त्रिवेदी, सचिन अग्निहोत्री, शिवकुमारी अग्निहोत्री, श्रीराम शर्मा, रमेश मुर्डीव व डॉ. अशोक बिरबल जैन प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री तर संचालन प्रा. प्रफुल्ल दाते यांनी केले. तर आभार डॉ. अशोक बिरबल जैन यांनी मानले. या कार्यक्रमाला जय महाकाली शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.