शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निराधारांचे मानधन बंद झाल्याने अपंग संजयवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:23 IST

येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देअपंगत्वामुळे भोगतो मरणयातना : आत्महत्येची मागितली परवानगी

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो. यातही अपंगत्व जर एखाद्या घरात आले तर त्याला उपचार करणे ही कठीण जाते असाच प्रकार विरुळ येथील संजय दाभाडे या तरुणाच्या बाबत घडला आहे.संजय हा इतरासारखा सुदृढ व मेहनती तरुण होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला हा तरुण अंग मेहनतीचे काम करुन आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांचे व आजारी बहीणीचे पोट भरत होेता. म्हातारपणामुळे आई वडीलांनी जगाचा निरोप घेतला व काही दिवसातच आजारपणामुळे बहीणीने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे बहीणीच्या दोन लहाण मुलींची जबाबदारी त्यावर आली ही जबाबदारी तो यशस्वीपणे पार पाडत असतांना संजय आजारी पडला व या आजारपणात त्याला कायमचे अपंगत्व आले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे तो उपचार करु शकला नाही. संजयला आता उभेही राहता येत नाही जमीनीवर घुसुन त्याला पुढे जावे लागते. शेजारील व्यक्ती त्याला उचलुन नेतात. शासनाच्या सहाशे रुपये निराधाराच्या मानधनावर तो कसाबसा जगत असतांना मागील सहा महिन्यांपासुन त्याचे निराधाराचे मानधन बंद झाले. तो आर्थिक अडचणीत अडकला आहे. मानधन सुरु करावे म्हणुन तो सबंधित अधिकाºयांना विनवणी करीत आहे मात्र शासनाचे निगरगट्ट अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्याने शासनाला आत्महत्या करण्याची परवानगी मागीतली आहे. तहसील व बँकेचे कर्मचारी त्याला हे कागद पत्र आणा ते पत्र आणा म्हणुन त्रास देत आहे त्याला जाग्यावरुन उठताच येत नाही त्यामुळे तो कागदपत्राची पुर्तता करु शकत नाही. त्यात त्याचे राहते घर ही कोसळण्याच्या मार्गावर आहे अपंग कोट्यातून घरकुल मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा शासनाकडे अर्ज सादर केला परंतु अजुनही घरकुल मिळाले नाही. अशा बिकट स्थित तो मरणयातना सहन करीत जगत आहे.