शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पुलाच्या कामामुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:26 IST

शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रस्त्यावरील लहान-मोठ्या नाल्यांवर जुने ढोल्यांचे पूल काढून नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम-शेडगाव रस्ता : कामांचे फलक नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/मांडगाव : शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रस्त्यावरील लहान-मोठ्या नाल्यांवर जुने ढोल्यांचे पूल काढून नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे. हे काम करीत असताना दिवसा करून ठेवलेले खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, रात्रीच्या काळोखात वाहन धारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.सेवाग्राम ते शेडगाव चौरस्ता या मार्गाच्या रूंदीकरणाचे तथा लहान-मोठ्या नाल्यांवरील जुने ठेंगणे पूल काढून नवीन उंच पुलांची निर्मिती केली जात आहे. हे करीत असताना दिवसा खड्डे केले जातात; पण ते बुजविले जात नाहीत. रात्रीच्या काळोखात हे खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत. शिवाय काही नागरिक दुचाकीने ये-जा करतात. ते सकाळी या मार्गाने जातात तर त्यांना रस्ता व्यवस्थित दिसतो; पण रात्री परत येत असताना चांगल्या रस्त्यावर खड्डे आढळतात. परिणामी, त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सेवाग्राम ते मांडगावपर्यंतच्या ग्रामीण भागातील नागरिक या मार्गाने बहुदा दुचाकीनेच प्रवास करतात. यामुळे त्यांनाच अधिक त्रास सोसावा लागतो. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.दिशादर्शक, पांढरे पट्टे नसल्याने अपघातमांडगाव ते सेवाग्राम मार्गावर सुरू असलेल्या कामांबाबत कुठेही फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे कुठे काम सुरू आहे, कुठून वळण रस्ता केला आहे वा कुठे रस्ता खराब आहे, हे कळायला मार्ग नाही. परिणामी, दुचाकी चालकांना हमखास अपघातांना सामोरे जावे लागते. नव्याने तयार करण्यात आलेले पूल वा रस्त्यावर कुठेही पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे.रस्त्यावर टाकली जाते रेती, गिट्टीसेवाग्राम ते शेडगाव चौरस्त्यापर्यंत रस्ता रूंदीकरण तथा नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे. हे काम करीत असताना त्यासाठी लागणारे साहित्य रेती, गिट्टी, मुरूम रस्त्यावरच आणून टाकले जात आहे. परिणामी, या साहित्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिकांचे रेती, गिट्टीवरून घसरून अपघात झाले आहेत. त्यांना अकारण औषधोपचाराचा भुर्दंड सोसावा लागला आहे. या प्रकारामुळे कंत्राटदाराप्रती रोष व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाने लक्ष देत कंत्राटदारास समज देणे गरजेचे आहे.