शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पुलाच्या कामामुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:26 IST

शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रस्त्यावरील लहान-मोठ्या नाल्यांवर जुने ढोल्यांचे पूल काढून नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम-शेडगाव रस्ता : कामांचे फलक नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/मांडगाव : शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रस्त्यावरील लहान-मोठ्या नाल्यांवर जुने ढोल्यांचे पूल काढून नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे. हे काम करीत असताना दिवसा करून ठेवलेले खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, रात्रीच्या काळोखात वाहन धारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.सेवाग्राम ते शेडगाव चौरस्ता या मार्गाच्या रूंदीकरणाचे तथा लहान-मोठ्या नाल्यांवरील जुने ठेंगणे पूल काढून नवीन उंच पुलांची निर्मिती केली जात आहे. हे करीत असताना दिवसा खड्डे केले जातात; पण ते बुजविले जात नाहीत. रात्रीच्या काळोखात हे खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत. शिवाय काही नागरिक दुचाकीने ये-जा करतात. ते सकाळी या मार्गाने जातात तर त्यांना रस्ता व्यवस्थित दिसतो; पण रात्री परत येत असताना चांगल्या रस्त्यावर खड्डे आढळतात. परिणामी, त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सेवाग्राम ते मांडगावपर्यंतच्या ग्रामीण भागातील नागरिक या मार्गाने बहुदा दुचाकीनेच प्रवास करतात. यामुळे त्यांनाच अधिक त्रास सोसावा लागतो. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.दिशादर्शक, पांढरे पट्टे नसल्याने अपघातमांडगाव ते सेवाग्राम मार्गावर सुरू असलेल्या कामांबाबत कुठेही फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे कुठे काम सुरू आहे, कुठून वळण रस्ता केला आहे वा कुठे रस्ता खराब आहे, हे कळायला मार्ग नाही. परिणामी, दुचाकी चालकांना हमखास अपघातांना सामोरे जावे लागते. नव्याने तयार करण्यात आलेले पूल वा रस्त्यावर कुठेही पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे.रस्त्यावर टाकली जाते रेती, गिट्टीसेवाग्राम ते शेडगाव चौरस्त्यापर्यंत रस्ता रूंदीकरण तथा नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे. हे काम करीत असताना त्यासाठी लागणारे साहित्य रेती, गिट्टी, मुरूम रस्त्यावरच आणून टाकले जात आहे. परिणामी, या साहित्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिकांचे रेती, गिट्टीवरून घसरून अपघात झाले आहेत. त्यांना अकारण औषधोपचाराचा भुर्दंड सोसावा लागला आहे. या प्रकारामुळे कंत्राटदाराप्रती रोष व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाने लक्ष देत कंत्राटदारास समज देणे गरजेचे आहे.