शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तुटक्या गतिरोधकांमुळे वाहनांत बिघाड

By admin | Updated: September 15, 2016 01:03 IST

शहरात आधीच अनधिकृत गतिरोधकांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अधिकृत असलेले गतिरोधकही मनस्ताप देणारे ठरत आहे.

पंक्चर होण्याची भीती : प्लास्टिकच्या गतिरोधकातील खिळे पडले उघडे वर्धा : शहरात आधीच अनधिकृत गतिरोधकांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अधिकृत असलेले गतिरोधकही मनस्ताप देणारे ठरत आहे. इंदिरा गांधी चौकातून शिवाजी पुतळ्याकडे जात असलेल्या रस्त्यावर केसरीमल विद्यालयासमोरील प्लास्टिकच्या गतिरोधकातील खिळे उघडे पडले आहे. त्यामुळे वाहने पंक्चर होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. वर्धा नागपूर मार्गावर इंदिरा गांधी चौकात केसरीमल कन्या शाळा आणि भरत ज्ञान मांदिरम ही दोन विद्यालये आहेत. या मार्गावर नियमित वर्दळ असल्याने शाळा भरताना व सुटताना येथे गर्दी होते. ही बाब लक्षात घेत येथे गतिरोधकाची मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल घेत वाहतूक प्रशासनाद्वारे येथे दोन ठिकाणी प्लास्टिकचे तीन तीन गतिरोधक बसविण्यात आले. सदर गतिरोधक प्लास्टिकचे असल्याने ते बसविल्यापासूनच नागरिक संताप व्यक्त करीत होते. या गतिरोधकांमुळे पाठीचे आजार वाढत असल्याची ओरड होत होती. त्यामुळे काहीच महिन्यांपूर्वी या गतिरोधकांच्या मध्ये डांबराचा थर टाकून गतिरोधकांची उंची कमी करण्यात आली. पण सदर गतिरोधक रात्री होत असलेल्या जड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी तुटून गतिरोधकासाठी ठोकलेले खिळे उघडे पडले आहे. या खिळ्यामुळे वाहने पंक्चर होण्याची शक्यता बळावली असून त्यामुळे अपघाताचाही धोका वाढला आहे. सदर गतिरोधक पूर्णपणे हटवून येथे डांबरी गतिरोधक बसविण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)गतिरोधक तुटून उघडे पडलेले खिळे धोक्याचे नागरिकांची मागणी आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेता केसरीमल कन्या शाळेसमोर प्लास्टिकचे गतिरोधक बसविण्यात आले. या मार्गावर दिवसा जड वाहनांना बंदी असली तरी रात्रीला या मार्गाने जड वाहने धावतात. अशा जड वाहनांमुळे प्लास्टिकचे गतिरोधक ठिकठिकाणी तुटून त्यासाठी वापरण्यात आलेले खिळे उघडे पडले आहे. या उघड्या पडलेल्या खिळ्यांमुळे वाहने पंक्चर होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधकाहून जाताना वाहनांची गती खूपच कमी करावी लागत असल्याने वयोवृद्धांची वाहने तर अनेकदा बंदच पडतात. यामुळे अपाघाताचा धोका असतो. गातिरोधकच काढून टाकण्याची मागणीसदर परिसरात गतिरोधकाची मागणी करण्यात आली असली तरी ते गतिरोधक डांबराचे असावे, अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण झटपट गतिरोधक लावण्याच्या नादात वाहतूक विभागाद्वारे कडक प्लास्टिकचे गतिरोधक लावण्यात आले. यामुळे होत असलेला धोका लक्षात घेत काहीच दिवसांपूर्वी गतिरोधकांमध्ये डांबराचा मुलामाही टाकण्यात आला. पण सदर गतिरोधकच धोक्याचे ठरत असल्याने ते काढून येथे डांबराचे कमी उंचीचे पक्के गतिरोधक तयार करावे, अशी मागणीही वाहनचालकांतून करण्यात येत आहे.