शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बोर व्याघ्र प्रकल्पामुळे ‘ती’ चार गावे दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:59 IST

आर्वी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत.

ठळक मुद्देमंत्र्यांना साकडे : दादाराव केचेंची गावे पुनर्वसनाची मागणी

आॅनलाईन लोकमतवर्धा : आर्वी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. तेथील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेती करणेही कठीन झाले आहे. या चार गावांमधील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सदर गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करून गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केलेल्या निवेदनातून माजी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे.माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका या गावांमधील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात रोही, जंगली डुक्कर, वाघ, बिबट, अस्वल आदी प्राणी असून रोही व रानडुक्करांचे कळप शेतातील उभ्या पिकांची नासडी करतात. परिणामी, येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शिवाय वाघ, बिबट व अस्वल आदी वन्यप्राणी शेतकरी व शेतमजुरांवर हल्ला करून त्यांना जखमी करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीव मुठीत घेऊन शेतकरी व शेतमजुर शेतातील कामे करीत आहेत. माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका या गावांमधील शेतकºयांसह ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सदर गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करून या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना कुंदन जैस्वाल, अनिल लेंडे, प्रमोद डोळे, साहेबराव नांदुरकर, राजकुमार पेटकुले, सुदाम निकोडे, राधेश्याम जैस्वाल, जयंत चौधरी, अभिजीत जैस्वाल, सचिन इवनाथे, चंदु डोळे, कमलाकर लेंडे, विलास आटे, जगदीश वानखेडे, सुरेश नागोसे, राजु राठी आदींची उपस्थिती होती.