शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:52 IST

पवनूर शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालत असून शेतकºयांच्या हाती येणाऱ्या पिकावरही पाणी फेरले जात आहे.

ठळक मुद्देपवनूर शिवारातील शेतात हैदोस : तार कुंपणाच्या मागणीकडेही दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : पवनूर शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालत असून शेतकºयांच्या हाती येणाऱ्या पिकावरही पाणी फेरले जात आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.पवनूर येथील लक्ष्मण कोंडलकर यांच्या शेतातील दहा एकरातील कपाशीचे पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. यात त्यांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले, असा अंदाज शेतकºयाने व्यक्त केला. चांगल्या अवस्थेत असणारे कपाशीचे पीक ऐनवेळी वन्यप्राण्याने उद्ध्वस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनरक्षक एन.पी. जाधव यांनी पाहणी केली असून वरिष्ठांना कळविले आहे. यापूर्र्वीही पवनूर शिवारात श्वापदांनी मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान केले होते. वनविभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले होते; पण मिळणारी मदत ही अत्यल्प असल्याने त्यातून नुकसानाची भरपाई होत नाही. यामुळे वनविभागाने कुंपणासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी पवनूर येथील शेतकऱ्यानी केली होती. या मागणीचाही शासन दरबारी विचार करण्यात आला नाही. आता पुन्हा वन्य प्राण्यांची हैदोस घातला आहे. असाच हैदोस सुरू राहिला तर शेतकऱ्यांना उत्पादनच होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.डुकरांनी केले पीक भुईसपाटपिंपळखुटा : सुकळी (उबार) येथील महिला शेतकरी चंद्रकला गोड्डे यांच्या शेतातील डुकरांनी कपाशीचे पीक पूर्णत: भुईसपाट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्या-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानीची माहिती वनविभागाला दिली असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. यात तलाठी काही महत्त्वाची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत असल्यने नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा अद्याप होऊ शकलेला नाही. यावर्षी कापूस पिकाला मोठा खर्च आला असून बाजारभाव अल्प आहे. यामुळे यंदाचे कापूस पीक तोट्यात आहे. त्यातच हाताशी आलेले पीक जंगली श्वापदे नष्ट करीत आहेत. यामुळे शेतकरी हतबल असून नुकसानीच्या भरपाईकरिता शेतकऱ्याने वन विभागाला साकडे घातले आहे. वन विभागाने पंचनामे करून पिडीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.