शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांनंतर विरुळात कोरडा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:29 IST

कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावातील सर्वच विहिरी व अनेक घरगुती बोअर, हातपंप आटले. त्यामुळे पाण्याचा ठणठणाट आहे. दोन हातपंपावर ग्रामस्थांची भिस्त आहे. रखरखत्या उन्हात दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे अनेकांच्या घरी उन्हामुळे आजारी रुग्ण दिसून येत आहेत.

ठळक मुद्देनदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या मशीनमध्ये बिघाड : नवव्या दिवशीही नळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावातील सर्वच विहिरी व अनेक घरगुती बोअर, हातपंप आटले. त्यामुळे पाण्याचा ठणठणाट आहे. दोन हातपंपावर ग्रामस्थांची भिस्त आहे. रखरखत्या उन्हात दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेअनेकांच्या घरी उन्हामुळे आजारी रुग्ण दिसून येत आहेत. ३५ वर्षांपूर्वी गावात असाच दुष्काळ पडल्याचे जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात येते. हीच परिस्थिती यावर्षी निर्माण झाली आहे. गावाची लोकसंख्या साडेपाच ते सहा हजारांच्या जवळपास आहे. चार वॉर्ड असून या चारही वॉर्डातील घरगुती विहिरी, विंधन विहिरी एवढेच नव्हे तर कूपनलिकांनाही कोरड पडली आहे. कुठेच पाण्याचा थेंबही नाही. केवळ आकाजी वॉर्डातील भवानीमातेच्या मंदिराजवळील हातपंप सुरू आहेत. याच दोन हातपंपांवरून नागरिक पाणी घेत आहेत. मागील चार दिवसांपासून गावाला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करणाºया मशीनमध्ये बिघाड आल्याने पाणीपुरवठा बंद आहे.नागरिकांना आठ दिवसानंतर एकदाच पाणी मिळते. नवनियुक्त सरपंच दुर्गाप्रसाद मेहरे नागरिकांना दोन दिवसांआड पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु वीजपुरवठा हा नियमित नसल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. सद्यस्थितीत वर्धा नदीवरून पाणीपुरवठा होतो. येथील विहिरीला मुबलक पाणी आहे.मात्र विद्युत पुरवठा पूर्णवेळ राहात नसल्याने नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होऊ शकत नाही. विरुळ गावात प्रथमच ३० ते ३५ वर्षांनंतर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. ही सर्व बाब शासकीय अधिकाऱ्यांना माहिती असूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. गावात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.रखरखत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट३० ते ३५ वर्षांनंतर गावात प्रथमच टंचाई निर्माण झाल्याने कित्येक किलोमीटर अंतर पायपीट करून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. यात महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.भर उन्हात पाणी भरावे लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गावात पाण्याचा दुष्काळ असूनही शासकीय यंत्रणा झोपेचे सोंग घेऊन आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई