शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

ढोल बदडण्याचा कार्यक्रम!

By admin | Updated: December 27, 2014 22:55 IST

समस्या सुटो वा न सुटो; पण एखादी समस्या सुटण्याच्या मार्गावर असली की ती आपल्यामुळे, असे ढोल वाजविण्याचे काम राजकीय मंडळींना सांगण्याची गरज नाही. सध्या असाच ढोल शहरालगतच्या

राजेश भोजेकर - वर्धासमस्या सुटो वा न सुटो; पण एखादी समस्या सुटण्याच्या मार्गावर असली की ती आपल्यामुळे, असे ढोल वाजविण्याचे काम राजकीय मंडळींना सांगण्याची गरज नाही. सध्या असाच ढोल शहरालगतच्या ११ गावांच्या बांधकामाच्या प्रश्नावरुन बदडणे सुरू आहे.‘त्या’ ११ गावांचे बांधकाम कुणामुळे थांबले, हे सदर महोदय जनतेला सांगायला कचरतात. हे जर का त्यांनी सांगितले असते तर तो मनाचा मोठेपणा असता. याकडे दुर्लक्ष करून आपणच बांधकामाची बंदी उठविली, हे मात्र महोदय नि:संकोचपणे सांगत आहे. वर्धा शहरालगतच्या ११ गावांच्या हद्दीत एक तळमजला व वर दोन मजलेच बांधकामाची परवानगी होती. काही शिक्षण महर्षीने या नियमांची वाट लावत मजले चढविले. सुज्ञ नागरिकांनी यावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या गावांच्या परिसरातील बांधकामांना परवाना देऊ नये, असे निर्देशच दिले. यानंतर शासनाने सदर गावांत बांधकाम बंदीचे आदेश लागू केले. असे असताना काही धनिकांनी जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतींना हाताशी धरून बिनदिक्कतपणे अलिखित परवाने देऊन मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरूच ठेवले. अडचण झाली ती सामान्यांची! घामाच्या पैशातून या परिसरात भूखंड घेतला; पण परवानगी नसल्याने ते स्वप्नातील घर बांधू शकत नाही. चिरीमिरी देण्याचीही त्यांची ऐपत नाही, नव्हे त्यांना ती द्यायचीही नाही. यातच काही बड्या व्यक्तींचीही आपले साम्राज्य पसरविण्याची अडचण निर्माण झाली. येथूनच सदर ११ गावांच्या परिसरात बांधकामाला परवानगी मिळावी, ही मागणी पुढे आली. आघाडी शासन काळातच ही समस्या उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचली होती. नंतर बैठका झाल्या. समस्येचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्र्यांनी बांधकामावरील बंदी उठविण्याचे आदेश काढण्याचे निर्देश यंत्रणेला दिले होते. ‘सरकारी काम, चार महिने थांब’ याचा प्रत्यय त्यावेळी खुद्द उपमुख्यमंत्र्यांना आला. अशातच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आणि हा विषय मागे पडला. राज्यात नवे सरकार विराजमान झाले. नवे चेहरे निवडून आले. त्यांना काय करावं काय नाही, हेच कळेनासे झाल्याचा प्रत्यय वर्धेकरांना येत आहे. मग काय तर जुन्याच विषयाला नवी झळाळी देण्याचा खटाटोप सुरू झाला. या दृष्टीने जिल्हा बँकेचा विषय जनतेला माहिती आहे. आघाडी सरकारात त्या आदेशाच्या अंमलबजावणीचे सोपस्कार तेवढे शिल्लक होते. नव्या सरकारच्या काळात पुन्हा हा विषय पटलावर आला; मात्र शासनासाठी हा विषय केवळ वर्धेपूरता नसून राज्यातला आहे. या अनुषंगाने नागपूर अधिवेशनात बिल मंजूर केले. अंतिम शासन निर्णय जाहीर व्हायचा आहे, अशी जाणकारांची माहिती आहे. म्हणजेच विषय जेथला तेथेच; पण बाळ जन्मन्यापूर्वीच आनंद साजरा करणे सुरू झाले आहे. जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. देवळी तालुक्यात एका शेतकऱ्याला १२ एकरात १२ किलो कापूस पिकला, हे जिल्ह्याचे चित्र! आर्वी, कारंजा व आष्टी तालुक्यांची पैसेवारीत फसगत झाली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम! धरण असताना सिंचन नाही. बोरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला, पूढे काय, हे प्रश्न अधिवेशनात गाजविता आले असते तर ढोल वाजवून मी केले, हे सांगण्याची गरज पडली नसती़ लोकांनीच डोक्यावर घेतले असते. महोदयांना हे सांगणे म्हणजे सत्तेपूढे शहाणपण केल्यासारखे होईल.