शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

ढोल बदडण्याचा कार्यक्रम!

By admin | Updated: December 27, 2014 22:55 IST

समस्या सुटो वा न सुटो; पण एखादी समस्या सुटण्याच्या मार्गावर असली की ती आपल्यामुळे, असे ढोल वाजविण्याचे काम राजकीय मंडळींना सांगण्याची गरज नाही. सध्या असाच ढोल शहरालगतच्या

राजेश भोजेकर - वर्धासमस्या सुटो वा न सुटो; पण एखादी समस्या सुटण्याच्या मार्गावर असली की ती आपल्यामुळे, असे ढोल वाजविण्याचे काम राजकीय मंडळींना सांगण्याची गरज नाही. सध्या असाच ढोल शहरालगतच्या ११ गावांच्या बांधकामाच्या प्रश्नावरुन बदडणे सुरू आहे.‘त्या’ ११ गावांचे बांधकाम कुणामुळे थांबले, हे सदर महोदय जनतेला सांगायला कचरतात. हे जर का त्यांनी सांगितले असते तर तो मनाचा मोठेपणा असता. याकडे दुर्लक्ष करून आपणच बांधकामाची बंदी उठविली, हे मात्र महोदय नि:संकोचपणे सांगत आहे. वर्धा शहरालगतच्या ११ गावांच्या हद्दीत एक तळमजला व वर दोन मजलेच बांधकामाची परवानगी होती. काही शिक्षण महर्षीने या नियमांची वाट लावत मजले चढविले. सुज्ञ नागरिकांनी यावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या गावांच्या परिसरातील बांधकामांना परवाना देऊ नये, असे निर्देशच दिले. यानंतर शासनाने सदर गावांत बांधकाम बंदीचे आदेश लागू केले. असे असताना काही धनिकांनी जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतींना हाताशी धरून बिनदिक्कतपणे अलिखित परवाने देऊन मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरूच ठेवले. अडचण झाली ती सामान्यांची! घामाच्या पैशातून या परिसरात भूखंड घेतला; पण परवानगी नसल्याने ते स्वप्नातील घर बांधू शकत नाही. चिरीमिरी देण्याचीही त्यांची ऐपत नाही, नव्हे त्यांना ती द्यायचीही नाही. यातच काही बड्या व्यक्तींचीही आपले साम्राज्य पसरविण्याची अडचण निर्माण झाली. येथूनच सदर ११ गावांच्या परिसरात बांधकामाला परवानगी मिळावी, ही मागणी पुढे आली. आघाडी शासन काळातच ही समस्या उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचली होती. नंतर बैठका झाल्या. समस्येचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्र्यांनी बांधकामावरील बंदी उठविण्याचे आदेश काढण्याचे निर्देश यंत्रणेला दिले होते. ‘सरकारी काम, चार महिने थांब’ याचा प्रत्यय त्यावेळी खुद्द उपमुख्यमंत्र्यांना आला. अशातच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आणि हा विषय मागे पडला. राज्यात नवे सरकार विराजमान झाले. नवे चेहरे निवडून आले. त्यांना काय करावं काय नाही, हेच कळेनासे झाल्याचा प्रत्यय वर्धेकरांना येत आहे. मग काय तर जुन्याच विषयाला नवी झळाळी देण्याचा खटाटोप सुरू झाला. या दृष्टीने जिल्हा बँकेचा विषय जनतेला माहिती आहे. आघाडी सरकारात त्या आदेशाच्या अंमलबजावणीचे सोपस्कार तेवढे शिल्लक होते. नव्या सरकारच्या काळात पुन्हा हा विषय पटलावर आला; मात्र शासनासाठी हा विषय केवळ वर्धेपूरता नसून राज्यातला आहे. या अनुषंगाने नागपूर अधिवेशनात बिल मंजूर केले. अंतिम शासन निर्णय जाहीर व्हायचा आहे, अशी जाणकारांची माहिती आहे. म्हणजेच विषय जेथला तेथेच; पण बाळ जन्मन्यापूर्वीच आनंद साजरा करणे सुरू झाले आहे. जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. देवळी तालुक्यात एका शेतकऱ्याला १२ एकरात १२ किलो कापूस पिकला, हे जिल्ह्याचे चित्र! आर्वी, कारंजा व आष्टी तालुक्यांची पैसेवारीत फसगत झाली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम! धरण असताना सिंचन नाही. बोरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला, पूढे काय, हे प्रश्न अधिवेशनात गाजविता आले असते तर ढोल वाजवून मी केले, हे सांगण्याची गरज पडली नसती़ लोकांनीच डोक्यावर घेतले असते. महोदयांना हे सांगणे म्हणजे सत्तेपूढे शहाणपण केल्यासारखे होईल.