शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

खरसखांडा ते ठाणेगाव रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: May 29, 2016 02:22 IST

खरसखांडा ते ठाणेगाव हा तीन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पायी चालणेही कठीण झाले आहे.

काम निकृष्ट दर्जाचे : ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणीकारंजा (घा.) : खरसखांडा ते ठाणेगाव हा तीन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी सरपंच विकास नासरे व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. काही वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला होता. डांबरीकरणही झाले; पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहने तर सोडा पायी चालणेही कठीण झाले आहे. अत्यंत दुरवस्था झालेल्या या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना ठाणेगाव, कारंजा येथे ये-जा करावी लागते. दुचाकी वा चार चाकी वाहनांना या रस्त्याने जाताना असह्य त्रास सहन करावा लागतो. पूढे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. गत निवडणुकीत हा रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिलीत; पण निवडणुकीची आश्वासने पाळण्यासाठी नव्हे तर मते घेण्यासाठी असतात, या नियमानुसार हा रस्ता अद्याप दुरूस्त झाला नाही. यामुळे हा रस्ता त्वरित दुरूस्त करून ग्रामस्थांची समस्या सोडवावी, असा ठराव खरसखांडा ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. सदर ठराव व निवेदन सरपंच विकास नासरे, उपसरपंच विनोद नारनवरे व ग्रामस्थांनी आ. अमर काळे यांना पाठविले आहे. शिवाय संबंधित विभागांनाही निवेदन व ठरावाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. याकडे लक्ष देत रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)