शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:36 IST

राज्यात पाच लाख बेघरांना घरे दिली. देशात २०२४ पर्यंत एकही बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. मुद्रा योजनेत १३ कोटी लोकांना कर्ज दिले. शिवाय रोजगार निर्माण केला. श्रमेव जयते योजनेत ६० वर्षांवरील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : हिंगणघाट येथील जाहीर सभा, काँग्रेसवर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्यात पाच लाख बेघरांना घरे दिली. देशात २०२४ पर्यंत एकही बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. मुद्रा योजनेत १३ कोटी लोकांना कर्ज दिले. शिवाय रोजगार निर्माण केला. श्रमेव जयते योजनेत ६० वर्षांवरील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. सात बारा कोरा होईपर्यंत कर्ज माफी योजना थांबविण्यात येणार नाही. इतकेच नव्हे तर सिदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमुळे पुढील दहा वर्षांत ५० हजार लोकाना रोजगार निर्मिती होत अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ गोकुलधाम मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुनोत, शिवसेना शहर प्रमुख मुन्ना त्रिवेदी, समुद्र्रपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, पं. स. सभापती गंगाधर कोल्हे, डॉ. शिरीष गोडे, नगराध्यक्ष प्रेम बसतांनी रिपाइंचे विजय आगलावे, मुस्लिम आघाडीचे बिस्मिल्ला खाँ आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ही निवडणूक देशाचे भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हाती द्यायचे, देशात विकास व सुरक्षा कोण देऊ शकतो याचा निर्णय घेणारी आहे. त्यामुळेच देशाचा स्वाभिमान आणि अभिमान कायम ठेऊन आन-बाण-शान कायम ठेवण्यासाठी भाजपा आघाडीला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर कडाडून टीका करीत केंद्र व राज्यातील भाजपाने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आमदार अशोक शिंदे, रिपाइंचे विजय आगलावे, शिवसेनेचे राजेश सराफ यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन किशोर दिघे व राकेश शर्मा यांनी केले.राहुल गांधींचे भाषण काल्पनिक पात्राप्रमाणेकाँग्रेसने देशाची वाट लावली आहे. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा पणजोबा, आजी, वडील व आई यांनी सातत्याने जाहिरनाम्यातून दिला, तोच नारा आज राहुल गांधी देत आहेत. गरिबी तर हटली नाही; पण काँग्रेस पक्षातील नेते व त्यांचे चेले चपाट्यांची गरिबी हटली. या उलट मोदीजी हे सातत्याने गरीबी नष्ट करण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी यांची भाषणे मनोरंजन करणारी असून टीव्ही मालिकेतील काल्पनिक पात्राप्रमाणे असतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.ईएसआयसी योजनेचा १५ हजार कामगारांना फायदा - कुणावार७६८ कोटी रुपायांच्या योजना आपण चार वर्षात आणल्या. मी जी योजना या मतदार संघासाठी मागितल्या त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला झाला. नझुल जागा, ग्रामीण भागातील अतिक्रमण पट्टे मंजूर, कामगार यांना ईएसआयसी योजनेचा १५ हजार कामगारांना फायदा झाला. समाधान शिबीर अंतर्गत वर्ग २ ची जमीन १ करणे, टेक्सटाईल्स पार्क मध्ये ३०० कोटी रुपये निवेश असून १ हजार २०० लोकांना रोजगार मिळाल्याचे यावेळी आ. समीर कुणावार यांनी सांगितले. या जाहीर सभेदरम्यान माजी आमदार अशोक शिंदे यांच्यासह आदींनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019