शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

अधिकाऱ्यांच्या कोडगेपणानंतर चालकाची सतर्कताच आली कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:07 IST

राज्य परिवहन महामंडळाची बस नादुरुस्त असल्याची माहिती चालकाने वरिष्ठांना दिल्यानंतरही तिच बस घेऊन जाण्याच्या सूचना चालकाला करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी घेऊन नागरपूरकडे निघालेल्या बसचे सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ अचानक स्टेअरींग फ्री झाल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या खाली उतरली.

ठळक मुद्देभरधाव बसचे स्टेअरिंग झाले फ्री। ५५ प्रवासी थोडक्यात बचावले, दोन तास उन्हात ताटकळ

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : राज्य परिवहन महामंडळाची बस नादुरुस्त असल्याची माहिती चालकाने वरिष्ठांना दिल्यानंतरही तिच बस घेऊन जाण्याच्या सूचना चालकाला करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी घेऊन नागरपूरकडे निघालेल्या बसचे सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ अचानक स्टेअरींग फ्री झाल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या खाली उतरली. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण कायम ठेवल्याने मोठा अपघात टळला. ही घटना शनिवारला दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली असून महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.वर्धा आगाराची हिंगणघाटमार्गे नागपूरकडे जाणारी एमएच ४० वाय ५४३८ क्रमांकाची बस नादुरुस्त असल्याने ती चालविणे शक्य नाही, असे चालकाने आगारातील वरिष्ठांना सांगितले. तरिही वरिष्ठांनी दुर्लक्ष करुन तिच बस नागपूरकडे नेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे चालक प्रवीण लक्ष्मण काळसर्पे व वाहक अर्चना देवगीरकर ५५ प्रवाशी घेऊन नागपूरकडे निघाले. सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ या बसचे स्टेअरिंग अचानक फ्री झाल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. चालक काळसर्पे यांनी बसवरील नियंत्रण कायम ठेवल्याने मोठा अपघात टळला. सर्व प्रवाशांना बाहेर काढून चालकाने आगारातील वरिष्ठांची संपर्क साधत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. परंतु कोडग्या अधिकाºयांनी तब्बल दोन तासानंतर बस पाठविल्याने प्रवाशांना उन्हात ताटकाळत उभे राहावे लागले. यात लहान बालकांसह वृद्ध व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. 

टॅग्स :state transportएसटी