शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:57 IST

पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था राखण्याचे शांतता समितीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होवू नये, कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. उत्सव काळात कोणीही आक्षेपार्ह पोस्टरर्स लावणार नाही. घोषणा देणार नाही, अशा सूचना केल्या.प्रास्ताविक देवळीचे ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी केले. देवळी शहर व तालुक्यातील गावातील सामाजिक सलोख्याची भावना कायम राहून धार्मिक एकोपा टिकावा याकरीता सर्व धर्मियांनी सहकार्य करावे. डॉ. आंबेडकर यांचे आदर्श विचार लोकांनी अंगीकारावे अशी उपस्थितांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांनी शहराची सामाजिक एकोप्याची परंपरा यापुढेही टिकवून ठेवून येणारे सर्व राष्ट्रीय सण एकात्मतेच्या भावनेतून व शांततेत पार पाडतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेला ७० ते ८० जयंती मंडळाचे सदस्य, पोलीस मित्र आणि पोलीस पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला मिश्रा, ढुमणे, बुटे, पवन झाडे यांनी सहकार्य केले.शांतता समितीची सभातळेगाव (श्या.पं.) - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती सर्व समाजबांधव मोठ्या उत्साहात साजरी करतात. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या महत्वपूर्ण दिवसाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी पोलीस स्टेशन तळेगावचे ठाणेदार सुरेश भोयर यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. या बैठकीला तळेगाव ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, राजकीय व्यक्ती, प्रतिष्ठीत व्यक्ती, तरुण युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणेदार भोयर यांनी सर्व पोलीस पाटलांना आवश्यक त्या सूचना केल्या तसेच सर्व ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुकी शांततेत निघेल. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे सांगितले. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रास्ताविक ठाणेदार भोयर यांनी केले. आभार दक्षता कमेटीचे अध्यक्ष चंद्रशेखर जोरे यांनी मानले. सरपंच सुनीता जोरे, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. पीएसआय राठोड, परवेज खान, निलेश पेठकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती