शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

डॉ. आंबेडकरांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बौद्धधम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. बाबासाहेबांचे विचार या देशातील सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संपूर्ण आंबेडकरी अनुयायाची आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर मुंबई यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भदन्त राजरत्नद्वारे आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. धम्म विचार मंचावर परिषदेचे अध्यक्ष भदन्त आनंद महाथेरो दिल्ली, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मुन्नी भारती, दिल्ली परिषदेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे, अनिल जवादे हिंगणघाट, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. शुभाष खंडारे, डॉ. सुधाकर सोनोने, प्राचार्य डॉ. सुनील तोतडे, निरज गुजर, नयन सोनवणे, अविनाश पाटील, उमेश म्हैसकर, किशोर खैरकार, अजय मेहरा, रूपचंद भगत, गजानन दिघाडे, धर्मपाल ताकसांडे, गोरख भगत, सुरेश उमरे, महेंद्र कांबळे, संजय कांबळे, सरला भिमटे, दीपचंद घनमोडे, भिक्खू व भिक्खूनी संघ उपस्थित होते.उद्घाटन सत्रात समाजसेवक सुहास थूल व विशाल मानकर यांचा भदन्त आनंद महाथेरो दिल्ली यांच्या हस्ते तथागत बुद्ध मूर्ती, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह शाल देऊन करण्यात आला. सायंकाळी कृतिका बोरकर व रसिका बोरकर मुंबई यांचा भीम-बुद्ध गितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. परिषदेला दहा हजार पेक्षा अधिक समाज बांधव उपस्थित होते.प्रास्ताविक आयोजक भदन्त राजरत्न यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार मुकूंद नाखले यांनी मानले. परिषदेला गौतम पानतावणे, नितीन जुमडे, सचिन माटे, किशोर कांबळे, वंदना पाटील, रेखा सोनवणे, निरज ताकसांडे, सीतम मंदरेले, ताराचंद पाटील, सचिन थूल, अमित देशभ्रतार, निलेश ओंकार, आकाश चतुरपाळे आदींनी सहकार्य केले.बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाजाकरिता महत्त्वाचे कार्य केलेले आहे. यामुळे बाबासाहेबांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही तर त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, अशी मते बौद्ध धम्म परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केली. परिषदेला उपस्थित असंख्य समाज बांधवांनीही यास प्रतिसाद देत संकल्प केला.