शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

डॉ. आंबेडकरांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बौद्धधम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. बाबासाहेबांचे विचार या देशातील सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संपूर्ण आंबेडकरी अनुयायाची आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर मुंबई यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भदन्त राजरत्नद्वारे आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. धम्म विचार मंचावर परिषदेचे अध्यक्ष भदन्त आनंद महाथेरो दिल्ली, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मुन्नी भारती, दिल्ली परिषदेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे, अनिल जवादे हिंगणघाट, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. शुभाष खंडारे, डॉ. सुधाकर सोनोने, प्राचार्य डॉ. सुनील तोतडे, निरज गुजर, नयन सोनवणे, अविनाश पाटील, उमेश म्हैसकर, किशोर खैरकार, अजय मेहरा, रूपचंद भगत, गजानन दिघाडे, धर्मपाल ताकसांडे, गोरख भगत, सुरेश उमरे, महेंद्र कांबळे, संजय कांबळे, सरला भिमटे, दीपचंद घनमोडे, भिक्खू व भिक्खूनी संघ उपस्थित होते.उद्घाटन सत्रात समाजसेवक सुहास थूल व विशाल मानकर यांचा भदन्त आनंद महाथेरो दिल्ली यांच्या हस्ते तथागत बुद्ध मूर्ती, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह शाल देऊन करण्यात आला. सायंकाळी कृतिका बोरकर व रसिका बोरकर मुंबई यांचा भीम-बुद्ध गितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. परिषदेला दहा हजार पेक्षा अधिक समाज बांधव उपस्थित होते.प्रास्ताविक आयोजक भदन्त राजरत्न यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार मुकूंद नाखले यांनी मानले. परिषदेला गौतम पानतावणे, नितीन जुमडे, सचिन माटे, किशोर कांबळे, वंदना पाटील, रेखा सोनवणे, निरज ताकसांडे, सीतम मंदरेले, ताराचंद पाटील, सचिन थूल, अमित देशभ्रतार, निलेश ओंकार, आकाश चतुरपाळे आदींनी सहकार्य केले.बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाजाकरिता महत्त्वाचे कार्य केलेले आहे. यामुळे बाबासाहेबांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही तर त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, अशी मते बौद्ध धम्म परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केली. परिषदेला उपस्थित असंख्य समाज बांधवांनीही यास प्रतिसाद देत संकल्प केला.