लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रोहणी नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे चिकणी (जामणी), पढेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड केली. याच पावसामुळे बºयाच शेतकऱ्यांची कपाशी उगवलीही; मात्र, मृग नक्षत्राने दगा दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही.१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते.उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत. या रोपट्यांना पावसाची नितांत गरज असल्याने शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे आहेत. आठ-दहा दिवसात पाऊस जर नाही आलात तर परिसरातील पूर्णच शेतशिवार काळेभोर होतील. यामुळे परिसरातील शेतकरी चिंंतातुर असल्याचे दिसून येते.पावसाअभावी पिके अडचणीतरोहणा : धूळ पेरणी आणि पाऊस येईलच या अपेक्षेने लवकर पेरणी केली त्यांची पिके समाधानकारक असली तरी थोड्या उशीरा पेरणी केली, त्यांच्या पेरणीनंतर पर्याप्त पाऊस न आल्याने सोयाबीन, कापूस व तुरीची पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत.अजून एक दोन दिवस पाऊस आला नाही तर अंकुर जमिनीतच करपून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणे खरेदीचे संकट ओढवणार आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर बियाणे वाटप करावी, अशी मागणी होत आहे
चिकणीसह परिसरात दुबार पेरणीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST
१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते. उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत.
चिकणीसह परिसरात दुबार पेरणीचे सावट
ठळक मुद्देशेतकरी चिंतित : आठवडाभरापासून पावसाची दडी, पिकांना पावसाची प्रतीक्षा