शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

चिकणीसह परिसरात दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते. उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : आठवडाभरापासून पावसाची दडी, पिकांना पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रोहणी नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे चिकणी (जामणी), पढेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड केली. याच पावसामुळे बºयाच शेतकऱ्यांची कपाशी उगवलीही; मात्र, मृग नक्षत्राने दगा दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही.१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते.उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत. या रोपट्यांना पावसाची नितांत गरज असल्याने शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे आहेत. आठ-दहा दिवसात पाऊस जर नाही आलात तर परिसरातील पूर्णच शेतशिवार काळेभोर होतील. यामुळे परिसरातील शेतकरी चिंंतातुर असल्याचे दिसून येते.पावसाअभावी पिके अडचणीतरोहणा : धूळ पेरणी आणि पाऊस येईलच या अपेक्षेने लवकर पेरणी केली त्यांची पिके समाधानकारक असली तरी थोड्या उशीरा पेरणी केली, त्यांच्या पेरणीनंतर पर्याप्त पाऊस न आल्याने सोयाबीन, कापूस व तुरीची पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत.अजून एक दोन दिवस पाऊस आला नाही तर अंकुर जमिनीतच करपून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणे खरेदीचे संकट ओढवणार आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर बियाणे वाटप करावी, अशी मागणी होत आहे

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती