शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

डोअर टू डोअर सर्व्हेत ३,००९ संशयित कुष्ठरूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:36 IST

कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने पंधरा दिवस जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्व्हे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या १,२९२ पथकांकडून जिल्ह्यात पंधरा दिवस मोहीम

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने पंधरा दिवस जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्व्हेच्या आठ दिवसात बुधवारपर्यंत ३,००९ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील काहींची तपासणी केली असता ३५ नवे रुग्ण आढळून आले आहे. ही संख्या गतवर्षीच्या सर्व्हेच्या तुलनेत कमी असली तरी कुष्ठरुग्णाच्या प्रमाणाचे शुन्य गाठने सध्या तरी शक्य नसल्याचे दिसत आहे.शासनाच्यावतीने विविध योजना राबवून कुष्ठरुग्णांचे प्रमाण दिलेल्या मानकाच्या तुलनेत आणण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली. आरोग्य संस्थेने दिलेल्या मानकानुसार १० हजार रुग्णांमागे १ पेक्षा कमी रुग्ण असणे अपेक्षित आहे. मात्र वर्धेत तसे नसल्याचे दिसते. जिल्ह्यात कुष्ठरुग्णांचे प्रमाण झालेल्या सर्व्हेनुसार १.४० एवढे असल्याचे दिसून आले आहे. असलेले प्रमाण कमी करण्याकरिता शासनाच्यावतीने डोअर टू डोअर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या सर्व्हेकरिता १ हजार २९२ चमू कार्यरत आहेत. या चमूत एक महिला आणि एका पुरूष कर्मचाºयाचा समावेश आहेत. या चमूने आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४७२ घरांची तपासणी केली आहे. संशयित असलेल्या रुग्णांपैकी ३५ जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे सामोर आले. या रुग्णांवर कुष्ठरोग विभागाकडून औषधोपचार करण्यात येत आहे. ही मोहीम २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात आढळले नऊ रूग्ण सांसर्गिकराबविण्यात आलेल्या सर्व्हेत ३५ नवे रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९ जणांना असलेला कुष्ठरोग सांसर्गिक असल्याचे दिसून आले आहे. आणखी पाच दिवसाचा कालावधी बाकी आहे, यात किती रुग्ण आढळतात यावर जिल्ह्याची टक्केवारी ठरणार आहे.१९ हजार ८०५ घरांवर ‘एक्स’चे निशाणया मोहिमेदरम्यान बंद असलेल्या घरांवर ‘एक्स’चे निशाण करण्यात आली. या घरांना पुन्हा भेट देत १३ हजार ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली.२,५८४ कर्मचारी देणार ३.०६ लाख घरांना भेटीशासनाच्या आदेशानुसार होणाºया या सर्व्हेत पंधरा दिवसात ३ लाख ६ हजार १९० घरांना भेटी देण्यात येणार आहे. याकरिता २ हजार ५८४ कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४७२ घरांना भेटी देण्यात आल्या.जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातून अनेक गैरसमज दूर होऊन नागरिकांत जनजागृती होत असून नागरिक स्वत: तपासणी करीत आहे.- के.झेड. राठोड, सहाय्यक संचालक,कुष्ठरोग, वर्धा