शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७ हजार ११९ नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे१२ महिन्यांतील स्थिती : अनेकांना गमवावा लागला जीव

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून भटक्या श्वानांनी नागरिकांना वेठीस धरल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेवारस श्वानांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील १२ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७ हजार ११९ जणांना चावा घेतल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट होते. हा शासकीय आकडा समस्येचे गांभीर्य दर्शविणारा आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा हे मोकाट श्वान पाठलाग करतात. यामुळे अपघात होऊन कित्येकांना अपंगत्वही आले आहे. सोबतच महामार्गावरही भटके श्वान आडवे जात असल्याने गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यास, त्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यास संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत प्रशासन अयशस्वी ठरले आहे.एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या १२ महिन्यांत ७ हजार ११९ जणांना श्वानदंश झाला. यातील अनेकांना जीवही गमवावा लागला. आर्वी उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशाची ६४२ प्रकरणे दाखल झाली. भिडी ग्रामीण रुग्णालय २४०, पुलगाव ग्रामीण रुग्णालय-६५९, वडनेर ग्रामीण रुग्णालय १३३, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट- ७९४, कारंजा ग्रामीण रुग्णालय ६०३, समुद्रपूर ग्रामीण रुग्णालय-३६६, सेलू ग्रामीण रुग्णालय ९१४ तर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २ हजार ७६८ इतकी प्रकरणे दाखल झाली आहेत. ही संपूर्ण आकडेवारी शासकीय आहेत. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातही उपचार घेतात. त्यामुळे श्वानदंशाचा आकडा ३० हजारांच्या जवळपास असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.बळावताहेत कोरड्या खोकल्याचे आजारजिल्ह्यात गत काही वर्षांपासून श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जाते. श्वानांच्या संख्यावाढीमुळे कोरड्या खोकल्यासह इतर आजार बळावत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.जन्मदर नियंत्रणाला यंत्रणांची बगलनगरपालिका, ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींकडून आकारल्या जाणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याची बाबदेखील समाविष्ट आहे. संबंधित यंत्रणेकडे रीतसर नोंदणी केल्यानंतरच जनावरे पाळता येतात. तसा नियम आहे. मात्र, या नियमाला गोपालक, नागरिकांकडून सर्रास पायदळी तुडविले जाते. याकडे यंत्रणेकडूनही सपशेल दुर्लक्ष केले जाते. स्वच्छता करापोटी रक्कम मात्र वसूल केली जाते. श्वानांच्या जन्मदर नियंत्रणाला पद्धतशीरपणे बगल दिली जात आहे.श्वान व इतर मोकाट जनावरांमुळे अस्वच्छता पसरते. यातूनच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नागरी वस्तीत जनावरांचा गोठाही बांधता येत नाही. तसा शासनाचा नियमही आहे. ‘स्वच्छ भारत’चा गाजावाजा केला जातो. मात्र, पालिकेकडून श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याविषयी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे ‘स्वच्छ अभियाना’चे तीन-तेराच होत आहेत.आशीष गोस्वामी, सचिव, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स, वर्धामोकाट श्वानांमुळे रेबीज व इतर संसर्गजन्य आजार बळावतात. कुत्री कुठलेही पाणी पितात, विष्टा करतात. सोबतच विशिष्ट ऋतूमध्ये श्वानांवर गोचिड व इतर कीटक असतात. यामुळे जीवघेणे आजार उद्भवतात. या सर्व बाबींवर जन्मदर नियंत्रण हा एकमेव उपाय आहे.डॉ. सचिन पावडेबालरोगतज्ज्ञ तथा अध्यक्ष, व्हीजेएम, वर्धा

टॅग्स :dogकुत्रा