शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७ हजार ११९ नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे१२ महिन्यांतील स्थिती : अनेकांना गमवावा लागला जीव

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून भटक्या श्वानांनी नागरिकांना वेठीस धरल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेवारस श्वानांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील १२ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७ हजार ११९ जणांना चावा घेतल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट होते. हा शासकीय आकडा समस्येचे गांभीर्य दर्शविणारा आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा हे मोकाट श्वान पाठलाग करतात. यामुळे अपघात होऊन कित्येकांना अपंगत्वही आले आहे. सोबतच महामार्गावरही भटके श्वान आडवे जात असल्याने गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यास, त्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यास संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत प्रशासन अयशस्वी ठरले आहे.एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या १२ महिन्यांत ७ हजार ११९ जणांना श्वानदंश झाला. यातील अनेकांना जीवही गमवावा लागला. आर्वी उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशाची ६४२ प्रकरणे दाखल झाली. भिडी ग्रामीण रुग्णालय २४०, पुलगाव ग्रामीण रुग्णालय-६५९, वडनेर ग्रामीण रुग्णालय १३३, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट- ७९४, कारंजा ग्रामीण रुग्णालय ६०३, समुद्रपूर ग्रामीण रुग्णालय-३६६, सेलू ग्रामीण रुग्णालय ९१४ तर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २ हजार ७६८ इतकी प्रकरणे दाखल झाली आहेत. ही संपूर्ण आकडेवारी शासकीय आहेत. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातही उपचार घेतात. त्यामुळे श्वानदंशाचा आकडा ३० हजारांच्या जवळपास असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.बळावताहेत कोरड्या खोकल्याचे आजारजिल्ह्यात गत काही वर्षांपासून श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जाते. श्वानांच्या संख्यावाढीमुळे कोरड्या खोकल्यासह इतर आजार बळावत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.जन्मदर नियंत्रणाला यंत्रणांची बगलनगरपालिका, ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींकडून आकारल्या जाणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याची बाबदेखील समाविष्ट आहे. संबंधित यंत्रणेकडे रीतसर नोंदणी केल्यानंतरच जनावरे पाळता येतात. तसा नियम आहे. मात्र, या नियमाला गोपालक, नागरिकांकडून सर्रास पायदळी तुडविले जाते. याकडे यंत्रणेकडूनही सपशेल दुर्लक्ष केले जाते. स्वच्छता करापोटी रक्कम मात्र वसूल केली जाते. श्वानांच्या जन्मदर नियंत्रणाला पद्धतशीरपणे बगल दिली जात आहे.श्वान व इतर मोकाट जनावरांमुळे अस्वच्छता पसरते. यातूनच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नागरी वस्तीत जनावरांचा गोठाही बांधता येत नाही. तसा शासनाचा नियमही आहे. ‘स्वच्छ भारत’चा गाजावाजा केला जातो. मात्र, पालिकेकडून श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याविषयी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे ‘स्वच्छ अभियाना’चे तीन-तेराच होत आहेत.आशीष गोस्वामी, सचिव, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स, वर्धामोकाट श्वानांमुळे रेबीज व इतर संसर्गजन्य आजार बळावतात. कुत्री कुठलेही पाणी पितात, विष्टा करतात. सोबतच विशिष्ट ऋतूमध्ये श्वानांवर गोचिड व इतर कीटक असतात. यामुळे जीवघेणे आजार उद्भवतात. या सर्व बाबींवर जन्मदर नियंत्रण हा एकमेव उपाय आहे.डॉ. सचिन पावडेबालरोगतज्ज्ञ तथा अध्यक्ष, व्हीजेएम, वर्धा

टॅग्स :dogकुत्रा