शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

२,११० शेतकऱ्यांची कागदपत्रे पाठविली बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

कोरोना संकटातच खरीप हंगाम तोंडावर असल्याने सध्या शेतकरी पीककर्जासाठी बँकांमध्ये गर्दीत करीत आहे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून सातबारा, पेरापत्रक, आठ-अ, फेरफार पंजी मिळवून ती पीककर्जाच्या प्रस्तावाला जोडणे गरजेचे असते. हिच कागदपत्रे कोरोना काळातही शेतकऱ्यांना वेळीच उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर तहसीलदारांनी विशेष काळजी घेत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देपीककर्ज : वर्धा तहसील कार्यालयात ४८ तासांत होतोय निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच शेतकऱ्यांना पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रे झटपट मिळावे या हेतूने वर्धा तालुका प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वेगळी यंत्रणा उभी केली आहे. याच यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत वर्धा तालुक्यातील २ हजार ११० शेतकऱ्यांचे पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे बँकांना पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बँकांकडून यादी प्राप्त झाल्यावर वर्धा तहसील कार्यालयाकडून ४८ तासांतच प्रकरणांचा निपटारा केला जात आहे.कोरोना संकटातच खरीप हंगाम तोंडावर असल्याने सध्या शेतकरी पीककर्जासाठी बँकांमध्ये गर्दीत करीत आहे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून सातबारा, पेरापत्रक, आठ-अ, फेरफार पंजी मिळवून ती पीककर्जाच्या प्रस्तावाला जोडणे गरजेचे असते. हिच कागदपत्रे कोरोना काळातही शेतकऱ्यांना वेळीच उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर तहसीलदारांनी विशेष काळजी घेत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा तहसील कार्यालयात विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे. याच यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत २ हजार ११० शेतकऱ्यांचे पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे वर्धा तहसील कार्यालयाकडून बँकांना पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.तालुक्याबाहेरील १५४ शेतकऱ्यांना मिळाला आधारयादी प्राप्त झाल्यानंतर प्रकरण निकाली काढताना १५४ शेतकरी तालुक्याबाहेरील असल्याचे पुढे आले. या शेतकऱ्यांचेही पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे बँकांना पाठविण्यात आले आहेत. यात सेलू १०५, देवळी २८ तर हिंगणघाटच्या २८ शेतकºयांचा समावेश आहे.अशी निकाली निघताय प्रकरणबँकेकडून ई-मेल द्वारे शेतकऱ्यांच्या नावाची यादी तहसील कार्यालयाला प्राप्त होते. त्यानंतर या यादीची प्रिंट कनिष्ठ लिपीक कुणाल डबरे घेत ती तलाठी विभागाला पाठवितो. सोनाली भोयर व त्यांचे सहकारी सातबारा, आठ-अ, नकाशा गोळा करतात. तर रेकॉर्ड रुम मधील खंडाकर, राऊत, गोटे, मेश्राम, संदीप सुरकार, लोचन गुरनुले, हर्षल बधेकर, अमोल काटकर हे शेतकऱ्यांच्या फेरफार पंजीचा शोध घेऊन त्याची प्रमाणीत प्रत गोळा करतात. त्यानंतर हे संपूर्ण कागदपत्रे बमनोटे या शिपायामार्फत बँकांमध्ये पाठविले जातात.१०७ याद्या निकालीएखाद्या शेतकऱ्याने पीककर्जासाठी बँकेत आवेदन केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या प्रकरणाला लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची मागणी बँकेकडून तहसील कार्यालयाकडे केली जाते. आतापर्यंत वर्धा तहसील कार्यालयाला शेतकऱ्यांच्या ११३ याद्या बँकांकडून प्राप्त झाल्या. त्यापैकी १०७ याद्यातील शेतकऱ्यांची कागदपत्रे तहसील कार्यालयाने बँकांना पाठविले आहे.बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावाची यादी प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन पीककर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ४८ तासांच्या आत बँकांना पुरविले जात आहे. यासाठी विशेष यंत्रणा वर्धा तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आली आहे.- डॉ. शकुंतला पाराजे, नायब तहसीलदार, वर्धा.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज