शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:32 IST

राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे.

ठळक मुद्देरणजित पाटील यांची वर्धेत बैठक : नगरविकास मंत्र्यांपुढे नगरसेवकांनी मांडले गाऱ्हाणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे. पण शासनाचे दुर्लक्ष असल्याने वर्धेकरांची अपेक्षापूर्ती कशी करणार हा मोठा प्रश्न नगरसेवकांपुढे आहे. त्यामुळे पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका, अशी मागणी करीत सर्व नगरसेवकांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ना. डॉ. रणजित पाटील वर्धेत आले होते. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवकांनी तक्रारीचा पाढा वाचत तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रात राज्यात आणि वर्धा नगर पालिकेतही भाजपाची सत्ता असताना आणि विकास कामे करण्याकरिता पालिकेकडे सक्षम यंत्रणा असताना पालिकेच्या हक्काचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला जातो. यामुळे नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या मागण्यांना न्याय देऊ शकत नाही. तरीही पालिका स्वत:च्या खर्चातून विकास कामे करीत आहेत. आज पालिकेच्या इमारतीला जवळपास ८ कोटी रुपयांची गरज आहे. जलतरण तलावाचे काम सुरू असून त्याला १ कोटी १० लाख रुपयांची गरज असताना तोटका निधी मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापन व मल:निस्सारणचे कामही पालिकेने हाती घेतले आहे. पण, शासनाकडून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याने या विकास कामांवर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील वाहतूक आणि पार्कींगच्या दृष्टीने टिळक मार्केटचा प्लॅन तयार करण्यात आला. पण, निधी अभावी तो गुंडाळून ठेवला आहे. सत्ता असतानाही केवळ राजकीय वर्चस्वापोटी पालिकेला निधी मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नगरसेवकांच्या तक्रारीचा ओघ पाहून ना. पाटील थक्क झाले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, गटनेता प्रदीप ठाकरे, सुनील गफाट यांच्यासह इतरही नगरसेवक उपस्थित होते.शहरातील कचरा संकलनाकरिता नगरपरिषदेला २२ वाहने लागतात. मात्र निधी नसल्याने पालिका हे काम केवळ १० वाहनाच्या माध्यमातून करीत आहे. पालिका नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे पण शासन निधीत अडवणूक करीत असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.