शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:32 IST

राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे.

ठळक मुद्देरणजित पाटील यांची वर्धेत बैठक : नगरविकास मंत्र्यांपुढे नगरसेवकांनी मांडले गाऱ्हाणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे. पण शासनाचे दुर्लक्ष असल्याने वर्धेकरांची अपेक्षापूर्ती कशी करणार हा मोठा प्रश्न नगरसेवकांपुढे आहे. त्यामुळे पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका, अशी मागणी करीत सर्व नगरसेवकांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ना. डॉ. रणजित पाटील वर्धेत आले होते. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवकांनी तक्रारीचा पाढा वाचत तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रात राज्यात आणि वर्धा नगर पालिकेतही भाजपाची सत्ता असताना आणि विकास कामे करण्याकरिता पालिकेकडे सक्षम यंत्रणा असताना पालिकेच्या हक्काचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला जातो. यामुळे नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या मागण्यांना न्याय देऊ शकत नाही. तरीही पालिका स्वत:च्या खर्चातून विकास कामे करीत आहेत. आज पालिकेच्या इमारतीला जवळपास ८ कोटी रुपयांची गरज आहे. जलतरण तलावाचे काम सुरू असून त्याला १ कोटी १० लाख रुपयांची गरज असताना तोटका निधी मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापन व मल:निस्सारणचे कामही पालिकेने हाती घेतले आहे. पण, शासनाकडून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याने या विकास कामांवर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील वाहतूक आणि पार्कींगच्या दृष्टीने टिळक मार्केटचा प्लॅन तयार करण्यात आला. पण, निधी अभावी तो गुंडाळून ठेवला आहे. सत्ता असतानाही केवळ राजकीय वर्चस्वापोटी पालिकेला निधी मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नगरसेवकांच्या तक्रारीचा ओघ पाहून ना. पाटील थक्क झाले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, गटनेता प्रदीप ठाकरे, सुनील गफाट यांच्यासह इतरही नगरसेवक उपस्थित होते.शहरातील कचरा संकलनाकरिता नगरपरिषदेला २२ वाहने लागतात. मात्र निधी नसल्याने पालिका हे काम केवळ १० वाहनाच्या माध्यमातून करीत आहे. पालिका नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे पण शासन निधीत अडवणूक करीत असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.