शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:32 IST

राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे.

ठळक मुद्देरणजित पाटील यांची वर्धेत बैठक : नगरविकास मंत्र्यांपुढे नगरसेवकांनी मांडले गाऱ्हाणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे. पण शासनाचे दुर्लक्ष असल्याने वर्धेकरांची अपेक्षापूर्ती कशी करणार हा मोठा प्रश्न नगरसेवकांपुढे आहे. त्यामुळे पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका, अशी मागणी करीत सर्व नगरसेवकांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ना. डॉ. रणजित पाटील वर्धेत आले होते. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवकांनी तक्रारीचा पाढा वाचत तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रात राज्यात आणि वर्धा नगर पालिकेतही भाजपाची सत्ता असताना आणि विकास कामे करण्याकरिता पालिकेकडे सक्षम यंत्रणा असताना पालिकेच्या हक्काचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला जातो. यामुळे नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या मागण्यांना न्याय देऊ शकत नाही. तरीही पालिका स्वत:च्या खर्चातून विकास कामे करीत आहेत. आज पालिकेच्या इमारतीला जवळपास ८ कोटी रुपयांची गरज आहे. जलतरण तलावाचे काम सुरू असून त्याला १ कोटी १० लाख रुपयांची गरज असताना तोटका निधी मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापन व मल:निस्सारणचे कामही पालिकेने हाती घेतले आहे. पण, शासनाकडून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याने या विकास कामांवर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील वाहतूक आणि पार्कींगच्या दृष्टीने टिळक मार्केटचा प्लॅन तयार करण्यात आला. पण, निधी अभावी तो गुंडाळून ठेवला आहे. सत्ता असतानाही केवळ राजकीय वर्चस्वापोटी पालिकेला निधी मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नगरसेवकांच्या तक्रारीचा ओघ पाहून ना. पाटील थक्क झाले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, गटनेता प्रदीप ठाकरे, सुनील गफाट यांच्यासह इतरही नगरसेवक उपस्थित होते.शहरातील कचरा संकलनाकरिता नगरपरिषदेला २२ वाहने लागतात. मात्र निधी नसल्याने पालिका हे काम केवळ १० वाहनाच्या माध्यमातून करीत आहे. पालिका नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे पण शासन निधीत अडवणूक करीत असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.