शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:32 IST

राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे.

ठळक मुद्देरणजित पाटील यांची वर्धेत बैठक : नगरविकास मंत्र्यांपुढे नगरसेवकांनी मांडले गाऱ्हाणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे. पण शासनाचे दुर्लक्ष असल्याने वर्धेकरांची अपेक्षापूर्ती कशी करणार हा मोठा प्रश्न नगरसेवकांपुढे आहे. त्यामुळे पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका, अशी मागणी करीत सर्व नगरसेवकांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ना. डॉ. रणजित पाटील वर्धेत आले होते. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवकांनी तक्रारीचा पाढा वाचत तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रात राज्यात आणि वर्धा नगर पालिकेतही भाजपाची सत्ता असताना आणि विकास कामे करण्याकरिता पालिकेकडे सक्षम यंत्रणा असताना पालिकेच्या हक्काचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला जातो. यामुळे नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या मागण्यांना न्याय देऊ शकत नाही. तरीही पालिका स्वत:च्या खर्चातून विकास कामे करीत आहेत. आज पालिकेच्या इमारतीला जवळपास ८ कोटी रुपयांची गरज आहे. जलतरण तलावाचे काम सुरू असून त्याला १ कोटी १० लाख रुपयांची गरज असताना तोटका निधी मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापन व मल:निस्सारणचे कामही पालिकेने हाती घेतले आहे. पण, शासनाकडून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याने या विकास कामांवर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील वाहतूक आणि पार्कींगच्या दृष्टीने टिळक मार्केटचा प्लॅन तयार करण्यात आला. पण, निधी अभावी तो गुंडाळून ठेवला आहे. सत्ता असतानाही केवळ राजकीय वर्चस्वापोटी पालिकेला निधी मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नगरसेवकांच्या तक्रारीचा ओघ पाहून ना. पाटील थक्क झाले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, गटनेता प्रदीप ठाकरे, सुनील गफाट यांच्यासह इतरही नगरसेवक उपस्थित होते.शहरातील कचरा संकलनाकरिता नगरपरिषदेला २२ वाहने लागतात. मात्र निधी नसल्याने पालिका हे काम केवळ १० वाहनाच्या माध्यमातून करीत आहे. पालिका नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे पण शासन निधीत अडवणूक करीत असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.