नेत्यांनी ठेवावे भान : नियमांचे पालन गरजेचे; चालकांच्याही समस्या घ्याव्यात जाणूनगत मंगळवारी भाजपचे नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. मुंडे यांनी सीट बेल्ट घातला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर सीट बेल्टसह इतर सुरक्षा व्यवस्थेचा किती काळजीपूर्वक वापर होतो, नेत्यांच्या चालकांना त्यासंबंधीचे कितपत भान असते, येथपासून ते नेतेही त्याबाबत किती बेफिकीर असतात यावर प्रकाशझोत..त्यांच्या जीविताची सर्वांनाच काळजी वाटते म्हणून..!ही काळजी घ्यावेगाचं भान राखा. कायद्याने हलक्या मोटारगाडीवर वेगाचे बंधन नसले तरी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी वेग र्मयादित ठेवा. गाडीत मागे व पुढे बसणार्या सर्वांनी सीट बेल्ट बांधावेत. चालकांनी दररोज गाडीच्या इंजिनची पाहणी करावी. जरा जरी संशय आल्यास दुर्लक्ष न करता मेकॅनिकला तत्काळ दाखवावे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका. गाडीतील हवा व ब्रेक सिस्टीमची नियमित तपासणी करावी. महत्वाच्या लोकांच्या ताफ्यातील गाड्यांकडे विशेषत: लहान मुले कुतुहलाने पाहतात. कोणी आडवे येत नाही ना, याची दक्षता घ्या.नेत्यांना काही सूचना.. नेत्यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळा पाळल्यास विलंब टाळता येऊ शकतो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमांची संख्या वाढवायची आणि मग पळापळ होते.आपला चालक वेळेत जेवला आहे का, त्याला काही प्रकृतीचा त्रास आहे का, त्याला विश्रांतीची गरज आहे का, हे पाहण्याची जबाबदारी नेत्यांचीच असते.कायम एकच ड्रायव्हर घेण्यापेक्षा त्यांच्या आळीपाळीने ड्यूटी लावल्यास जास्त योग्य.आपण नेते आहोत म्हणून नियम मोडण्यात आपणच पुढाकार घेतो. ते टाळल्यास दुर्घटना टाळल्यास दुर्घटना टाळली जाऊ शकते. रोज आपण किती प्रवास करायचा याचेही बंधन घालून घ्यायला हवे.
वाहतुकीच्या नियमांना बगल नको..
By admin | Updated: June 9, 2014 00:03 IST