शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विवंचनेने करपलाय शेतकऱ्यांचा दीपोत्सव

By admin | Updated: October 22, 2014 23:21 IST

दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू आहे. शहरातील दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे; पण ग्रामीण भागात दिवाळी आहे, असे वाटत नाही. आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांच्या अंगात बळच उरले नाही.

सेलू : दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू आहे. शहरातील दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे; पण ग्रामीण भागात दिवाळी आहे, असे वाटत नाही. आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांच्या अंगात बळच उरले नाही. अनेक शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची, याची चिंता आहे. दारात दिवाळीचा दिवा लावताना तेल टाकण्याची कुवत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गृहिणी कापसाच्या वाती कशाबशा भिजवून दीपोत्सव साजरा करताहेत; पण तेल नसल्याने दिवणालीतील वातही करपून जात असल्याचे विदारक चित्र आहे़लहरी निसर्गाचा जबर फटका शेतकऱ्यांना यंदा बसला. दोन-तीन झालेच तर चार पोते प्रती एकराच्या वर सोयाबीनचा उतारा नाही. अनेकांनी सवंगणी केली नाही. पिकापेक्षा गवतच अधिक आहे. धान्य बाजारात तीन हजारांच्या वर भाव नाही. दिवाळीत बाजार समित्याही बंद आहेत़ ज्यांचे सोयाबीन निघाले, त्यांना विकण्याचीही अडचण आहे. अनेकांचे सोयाबीन निघायचे आहे. कपाशी अद्याप निघाली नाही़ काहींची शितादही झाली. बाजारपेठ सुरू झाली नाही. हातात पैसा नाही. सर्वच भिस्त शेतीवर असल्याने कर्ज फेडायचे की घरी खायचे, याचाही ताळमेळ नाही. शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांना दिवाळीला नवीन कपड्यांची वाणवाच आहे. चिमुकल्या मुलांनी नवीन कपडे, फटाके, मागितले की, पालकांची कालवा-कालव होते. सणालाही नवीन कपडे आपण देऊ शकत नाही, याचे दु:ख शेतकऱ्यांनी पचवायचे कसे, हा प्रश्न आहे. घरातील ही स्थिती पाहून गृहलक्ष्मी कधी नवीन साडीचा आग्रह करीत नाही; पण बाजूच्या एखाद्या नोकरदाराच्या पत्नीला आणलेली साडी पाहून तिचाही जीव करपलेल्या वातीसारखाच जळतो, हे विदारक वास्तव ग्रामीण भागात फिरल्याशिवाय दिसत नाही. गत दोन दिवसांत ग्रामीण भागात दिसलेले वास्तव पाषाणहृदयी व्यक्तींच्याही डोळ्यांतही पाणी आणल्याशिवाय राहत नाही. शारीरिकदृष्ट्या शेतकरी सक्षम दिसत असला तरी मनातून खचला आहे़ नवनिर्वाचित आमदारांना शेतकऱ्यांची चिंता असेल तर ग्रामीण भागात जाऊन यावे, शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी, चिंता तपासून नुकसानग्रस्तांच्या तोंडाला कशी पाने पुसली, याचा लेखाजोखा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मांडावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताहेत़(तालुका प्रतिनिधी)