शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

विवंचनेने करपलाय शेतकऱ्यांचा दीपोत्सव

By admin | Updated: October 22, 2014 23:21 IST

दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू आहे. शहरातील दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे; पण ग्रामीण भागात दिवाळी आहे, असे वाटत नाही. आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांच्या अंगात बळच उरले नाही.

सेलू : दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू आहे. शहरातील दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे; पण ग्रामीण भागात दिवाळी आहे, असे वाटत नाही. आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांच्या अंगात बळच उरले नाही. अनेक शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची, याची चिंता आहे. दारात दिवाळीचा दिवा लावताना तेल टाकण्याची कुवत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गृहिणी कापसाच्या वाती कशाबशा भिजवून दीपोत्सव साजरा करताहेत; पण तेल नसल्याने दिवणालीतील वातही करपून जात असल्याचे विदारक चित्र आहे़लहरी निसर्गाचा जबर फटका शेतकऱ्यांना यंदा बसला. दोन-तीन झालेच तर चार पोते प्रती एकराच्या वर सोयाबीनचा उतारा नाही. अनेकांनी सवंगणी केली नाही. पिकापेक्षा गवतच अधिक आहे. धान्य बाजारात तीन हजारांच्या वर भाव नाही. दिवाळीत बाजार समित्याही बंद आहेत़ ज्यांचे सोयाबीन निघाले, त्यांना विकण्याचीही अडचण आहे. अनेकांचे सोयाबीन निघायचे आहे. कपाशी अद्याप निघाली नाही़ काहींची शितादही झाली. बाजारपेठ सुरू झाली नाही. हातात पैसा नाही. सर्वच भिस्त शेतीवर असल्याने कर्ज फेडायचे की घरी खायचे, याचाही ताळमेळ नाही. शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांना दिवाळीला नवीन कपड्यांची वाणवाच आहे. चिमुकल्या मुलांनी नवीन कपडे, फटाके, मागितले की, पालकांची कालवा-कालव होते. सणालाही नवीन कपडे आपण देऊ शकत नाही, याचे दु:ख शेतकऱ्यांनी पचवायचे कसे, हा प्रश्न आहे. घरातील ही स्थिती पाहून गृहलक्ष्मी कधी नवीन साडीचा आग्रह करीत नाही; पण बाजूच्या एखाद्या नोकरदाराच्या पत्नीला आणलेली साडी पाहून तिचाही जीव करपलेल्या वातीसारखाच जळतो, हे विदारक वास्तव ग्रामीण भागात फिरल्याशिवाय दिसत नाही. गत दोन दिवसांत ग्रामीण भागात दिसलेले वास्तव पाषाणहृदयी व्यक्तींच्याही डोळ्यांतही पाणी आणल्याशिवाय राहत नाही. शारीरिकदृष्ट्या शेतकरी सक्षम दिसत असला तरी मनातून खचला आहे़ नवनिर्वाचित आमदारांना शेतकऱ्यांची चिंता असेल तर ग्रामीण भागात जाऊन यावे, शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी, चिंता तपासून नुकसानग्रस्तांच्या तोंडाला कशी पाने पुसली, याचा लेखाजोखा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मांडावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताहेत़(तालुका प्रतिनिधी)