शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या घरी लक्ष्मी पाठवून दिवाळीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:42 IST

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने पाच पट मोठी कर्जमाफी दिली आहे. हे सरकार शेतकºयांच्या हिताचे आहे. यामुळे अन्नदात्याला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाला आणखी कर्ज काढावे लागले तरी शासन तयार आहे.

ठळक मुद्देविनोद तावडे : जिल्ह्यात ८३७ कोटींची कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने पाच पट मोठी कर्जमाफी दिली आहे. हे सरकार शेतकºयांच्या हिताचे आहे. यामुळे अन्नदात्याला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाला आणखी कर्ज काढावे लागले तरी शासन तयार आहे. दिवाळीच्या लक्ष्मी पूजन सणाला शासनाने शेतकºयांच्या घरी लक्ष्मी पाठवून दिवाळीची सर्वोत्तम भेट दिली, असे मत शालेय शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.विकास भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमुक्तीचा शुभारंभ कार्यक्रम व पात्र शेतकरी कुटुंबांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, प्रभारी जिल्हाधिकारी संजय दैने, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी प्रत्येक तालुक्यातील तीन शेतकºयांचा प्रमाणपत्र, सदरा, पायजमा, साडी, चोळी देऊन २५ शेतकरी कुटुंबाचा तावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या २५ शेतकºयांना १० लाख ८५ हजार ६५१ रुपयांच्या कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तावडे पूढे म्हणाले की, सत्तेवर आल्यापासून शासनाने शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी पावले उचलली. जलयुक्त शिवारमुळे सिंचन क्षेत्रात वाढ, कृषी पंप जोडणी शेतकºयासाठी अनेक नवीन योजना सुरू करून त्याच्या शेतातील उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले; पण पाच वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. त्याला बँकेतून कर्ज मिळणे बंद झाल्याने शेतीची अर्थव्यवस्था संकटात आली होती. यामुळे शेतकºयांना कर्जमुक्त करणे निकडीचे होते. कर्जमाफीचा लाभ खºया शेतकºयांना मिळावा म्हणून शासनाने अटी घातल्या. यात आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, मनपा सदस्य व अधिकारी असे १२ लाख शेतकरी यातून थेट बाहेर पडले. याचा लाभ शेतकºयांना मिळाला, असे सांगितले.खा. तडस म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने आजपर्यतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली. याचा लाभ खºया शेतकºयांना मिळाला, याचा सर्वाधिक आनंद होत आहे. आॅनलाईनमुळे शेतकºयांना थोडा त्रास झाला; पण भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी हे आवश्यक आहे. यामुळे अपात्र शेतकरी वगळले गेले. डबघाईस निघालेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामुळे सुरळीत चालण्यासाठी मदत होईल. ज्यांच्या ठेवी बँकेत होत्या, त्यांना त्या काढता येतील. शिवाय शेतकºयांना या बँकेतून पुन्हा कर्ज मिळू शकेल.कर्ज थकल्याने शेतकºयांना कर्जपुरवठा थांबला होता. त्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने कर्जमुक्ती योजना राबविली. यात पात्र लाभार्थ्याचे आ. सोले, कुणावार व डॉ. भोयर यांनी कर्जमाफीबद्दल अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेत जिल्ह्याच्या परिस्थितीवर कडू यांनी प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाºयांनी ३५ दिवस १२-१३ तास काम करून याद्या केल्या. सहकारी बँकेच्या २१ हजार ५९६ शेतकºयांना १३७ कोटीची कर्जमाफी मिळणार आहे. उर्वरित राष्ट्रीयकृत बँकेचे थकबाकीदार शेतकºयांना ७०० कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. प्रत्येक खातेदाराचे व्यक्तीगत लेखापरीक्षण करण्यात आले आहे. यामुळे एकही अपात्र लाभार्थी सापडणार नाही.आठही तालुक्यातील २५ शेतकरी कुटुंबांचा सन्मानछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने बुधवारी आठही तालुक्यातील २५ शेतकरी कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. यात वर्धा तालुका- हनुमान मधुकर पिसे, रवींद्र परसराम नाईक, उत्तम तुकाराम पोहणकर, बयना एकनाथ भगत, हिंगणघाट- धनराज बाबाराव एंगट, चंद्रभान नानाजी बावणे, अशोक शंकर वासेकर, आर्वी - कैलास सखाराम पाटील, मोरेश्वर शंकर कोलाने, राजू विठ्ठल खुने, आष्टी - हरीदास नामदेव गवळी, देवेंद्र विश्वासराव कोहळे, मधुकर काशिराम जाने, कारंजा - विनोद रमेशराव टुले, सुभाष भीमराव ढोले, मोहन हरीराम मुने, सेलू - नामदेव शंकरराव किनगावकर, रामदास उत्तमराव रूमाले, कवडू नारायण सुरजूसे, देवळी - भारत पुुंडलिक राऊत, सुरेंद्र रामकृष्ण पाचघरे, इंदू किसना श्रीरामे, समुद्रपूर - बालाजी नत्थूजी कामडी, ज्ञानेश्वर रामाजी काटवले, कवडू शिवराम मून यांचा समावेश आहे.