शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विभागीय कृषी संचालकांसह डझनभर अधिकारी निजामपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:14 IST

विदर्भात अकोल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर गावात सुरेश भांगे या शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळल्याने कृषी विभाग हादरून गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : विदर्भात अकोल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर गावात सुरेश भांगे या शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळल्याने कृषी विभाग हादरून गेला आहे. रविवारी नागपूर विभागीय कृषी संचालकांसह डझनभर अधिकाऱ्यांनी निजामपूरात दाखल होऊन कपाशीच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्येक झाडाजवळ त्यांनी पाहणी करून या परिसरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘हायअलर्ट’ राहण्याचा इशारा जारी केला आहे.मागील वर्षी गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी उत्पादक शेतकºयांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहेत. यावर मात करण्यासाठी उन्हाळ्यातही कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या. तरीही गुलाबी बोंडअळी खरीपाच्या सुरूवातीलाच आढळून आल्याने कृषी विभागासह शेतकरी पुरता हादरून गेला आहे. त्यानंतर रविवारी विभागीय कृषी संचालक घाडके, वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, आर्वीचे उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे, तालुका कृषी अधिकारी गुल्हाणे, डॉ. उंबरकर, डॉ. नाईक, कृषी विस्तार अधिकारी संजय दुबे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती निकम, निजामपूरचे सरपंच प्रवीण वैद्य, शेतकरी सुरेश भांगे आदी उपस्थित होते.यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी भांगे यांच्या शेतातील कपाशी पिकाची पाहणी केली. येथे बोंडअळीचा मोठा प्रकोप झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जर बोंडअळीचा प्रकोप वाढला तर पुढील वर्षी कपाशीचे पिक लावूच नये असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला. त्याशिवाय अळ्या पूर्ण नष्ट होणार नाही. असेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या आर्वी येथील अधिकाऱ्यांकडून शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आठ आठ दिवस कृषी सहाय्यक गावांमध्ये जात नाही अशी तक्रार जि.प. सदस्य ज्योती निकम यांनी यावेळी नोंदविली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती