शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

महामार्गावरील डायव्हर्शन पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:24 IST

आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.

ठळक मुद्देमध्यरात्री दोन वाजतापासून वाहतूक ठप्प : जीवितहानी नाही, चार ट्रक थोडक्यात बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. शेकडो वाहनांचा मुक्काम जागीच झाला. बुधवारी सकाळी ६ वाजता पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. पाण्याचा वेग जास्त असल्याने काळजाचा ठोका वाढविणारे चित्र पाहायला मिळाले.निर्माणाधीन पुलाचे बांधकाम उन्हाळ्यात संथगतीने करण्यात आले. वेळेवर पूल झाला नाही. त्यामुळे बाजूला केलेल्या डायव्हर्शनवरून हजारो वाहने धावत होती. हा पूल जाम नदीवर असल्याने याठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने त्याचा प्रवाह डायव्हर्शनमुळे खुंटला होता. मात्र, पुराने रौद्र रूप धारण केल्याने टाकलेल्या १२ पायल्यांसह पूल वाहून गेला. पाण्याचा वेग जास्त होता. शिवाय, खळखळ आवाज आल्याने बाजूला झोपड्यांमध्ये राहणारे कंपनीचे कर्मचारी आले. लागलीच वाहन चालकांना थांबविण्यात आले. या मार्गाने जाणारे ४ ट्रक एकामागे एक जात होते. येथे कुणी सूचना करायला आले नसते तर अनर्थ झाला असता. याची कल्पनाच न केलेली बरी, अशा प्रतिक्रिया ट्रकचालकांनी लोकमतशी बोलताना दिली.बुधवारी सकाळी पावसाची दमदार हजेरी सुरूच होती. पाण्याच्या प्रवाहामुळे सर्व वाहतूक आष्टी, पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, बोरगाव (टुमणी), साहूर, वरूड तर काही वाहतुक साहूर, माणिकवाडा, नारा, काकडा, सुसुंद्रामार्गे कारंजा वळविण्यात आली. सकाळी महामार्गावर पोलिसांनी पाहणी करून वाहतुक सुरळीत केली.निर्माणाधीन पुलाकडे दुर्लक्षया रस्त्याचे काम आंध्रप्रदेश मधील आर.आर. कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले होते. पुलाचे काम सुरू केल्यावर अनेक दिवस स्लॅब टाकला नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून वाहतूक सुरू होण्यात बराच अडथळा निर्माण झाला होता. कंपनीचे अधिकारी या पुलाकडे फिरकत नव्हते. त्यामुळे आजचा भीषण प्रसंगाला पाहण्याची ग्रामस्थांवर वेळ आली.परिसरातील शेतात पाणीच पाणीजाम नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेती जलमय झाल्या आहेत. अनेक शेतातील भागात भगदाड पडले आहे. पीकही खराब झाले आहे. धाडी येथील विजय मानकर, अशोक तनाटे, सुयोग चोरे यांनी वळणमार्गे वाहतुकीची माहिती वाहनचालक आणि प्रवाशांना दिली. शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर