शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
2
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
4
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
5
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
6
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
7
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
8
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधा मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
9
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
10
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
13
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
16
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
17
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
18
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
19
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
20
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...

जिल्ह्यात १९.८० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यातही लवकर उत्पन्न येणारे सोयाबीन बियाण्यांची अनेक शेतकरी लागवड करतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ३१ हजार ८८४.२१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली, तर सध्या लवकर उत्पादन येणाऱ्या सोयाबीन पिकाच्या मळणीला शेतकरी गती देत असून, हेक्टरी १० ते १२ पोतींचा उतारा येत आहे. तर उर्वरित सोयाबीन पीक सध्या वेळीच कसे सवंगत त्याची मळणी करता येईल यासाठी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक प्रयत्न करीत आहे. यंदा जिल्ह्यात १९ लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. पण शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

अवघ्या दोन महिन्यात झाली भावात घसरण- ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल दहा हजारांवर पोहोचले होते. पण नंतर केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीनच्या भावात दिवसेंदिवस घसरण येत आहे. हिंगणघाट बाजारपेठेत मंगळवारी साेयाबीनला प्रति क्विंटल ३,००० ते ५,००१ रुपये भाव देण्यात आला.

३ हजार ९५० रुपये हमीभावn सायोबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात अजूनही सुरू झाली नसली तरी थोड्या प्रमाणात शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहे. यंदा शासनाने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव दिला आहे.

पावसाने मोडले कंबरडे- मध्यंतरी जिल्ह्यात उसंत घेत झालेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनला कोंब फुटली. यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. असे असले तरी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी सोयाबीन सवंगणी तसेच मळणीच्या कामाला गती देत आहेत. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे समाधानकारक उत्पन्न होईल असे चित्र बघावयास मिळत आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा 

 

टॅग्स :agricultureशेती