शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९.८० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यातही लवकर उत्पन्न येणारे सोयाबीन बियाण्यांची अनेक शेतकरी लागवड करतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ३१ हजार ८८४.२१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली, तर सध्या लवकर उत्पादन येणाऱ्या सोयाबीन पिकाच्या मळणीला शेतकरी गती देत असून, हेक्टरी १० ते १२ पोतींचा उतारा येत आहे. तर उर्वरित सोयाबीन पीक सध्या वेळीच कसे सवंगत त्याची मळणी करता येईल यासाठी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक प्रयत्न करीत आहे. यंदा जिल्ह्यात १९ लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. पण शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

अवघ्या दोन महिन्यात झाली भावात घसरण- ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल दहा हजारांवर पोहोचले होते. पण नंतर केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीनच्या भावात दिवसेंदिवस घसरण येत आहे. हिंगणघाट बाजारपेठेत मंगळवारी साेयाबीनला प्रति क्विंटल ३,००० ते ५,००१ रुपये भाव देण्यात आला.

३ हजार ९५० रुपये हमीभावn सायोबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात अजूनही सुरू झाली नसली तरी थोड्या प्रमाणात शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहे. यंदा शासनाने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव दिला आहे.

पावसाने मोडले कंबरडे- मध्यंतरी जिल्ह्यात उसंत घेत झालेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनला कोंब फुटली. यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. असे असले तरी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी सोयाबीन सवंगणी तसेच मळणीच्या कामाला गती देत आहेत. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे समाधानकारक उत्पन्न होईल असे चित्र बघावयास मिळत आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा 

 

टॅग्स :agricultureशेती