शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

जिल्ह्यात १९.८० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यातही लवकर उत्पन्न येणारे सोयाबीन बियाण्यांची अनेक शेतकरी लागवड करतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ३१ हजार ८८४.२१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली, तर सध्या लवकर उत्पादन येणाऱ्या सोयाबीन पिकाच्या मळणीला शेतकरी गती देत असून, हेक्टरी १० ते १२ पोतींचा उतारा येत आहे. तर उर्वरित सोयाबीन पीक सध्या वेळीच कसे सवंगत त्याची मळणी करता येईल यासाठी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक प्रयत्न करीत आहे. यंदा जिल्ह्यात १९ लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. पण शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

अवघ्या दोन महिन्यात झाली भावात घसरण- ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल दहा हजारांवर पोहोचले होते. पण नंतर केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीनच्या भावात दिवसेंदिवस घसरण येत आहे. हिंगणघाट बाजारपेठेत मंगळवारी साेयाबीनला प्रति क्विंटल ३,००० ते ५,००१ रुपये भाव देण्यात आला.

३ हजार ९५० रुपये हमीभावn सायोबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात अजूनही सुरू झाली नसली तरी थोड्या प्रमाणात शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहे. यंदा शासनाने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव दिला आहे.

पावसाने मोडले कंबरडे- मध्यंतरी जिल्ह्यात उसंत घेत झालेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनला कोंब फुटली. यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. असे असले तरी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी सोयाबीन सवंगणी तसेच मळणीच्या कामाला गती देत आहेत. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे समाधानकारक उत्पन्न होईल असे चित्र बघावयास मिळत आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा 

 

टॅग्स :agricultureशेती