शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

घरं देण्यात जिल्हा पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:02 IST

प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांच्या योजना अंमलात आणल्या.

ठळक मुद्देरमाई, शबरी व प्रधानमंत्री आवास नावालाच

आॅनलाईन लोकमतवर्धा : प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांच्या योजना अंमलात आणल्या. वर्धेत मात्र या योजना राबविताना प्रशासन माघारत असल्याचे दिसून आले आहे. शासनाने दिलेल्या वार्षिक उद्दिष्टापर्यंतही जिल्हा पोहोचला नसल्याचे दिसून आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेकांना पडक्या आणि तुटक्या घरातच राहण्याची वेळ आली आहे. अस्तित्त्वात असलेल्या योजना राबविण्यात जिल्हा पिछाडीवर आल्याचे दिसत आहे.गरजवंतांना हक्काचे घर मिळावे याकरिता रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना या तिन्ही योजनेच्या माध्यमातून गरजू व समाजातील दुर्बल घटकांना पक्की घरे बांधून दिली जातात. परंतु, सध्या या तिन्ही योजना नावालाच कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सन २०१६-१७ मध्ये ४ हजार ६६० घर बांधकामाचे उद्दिष्ट असताना केवळ २ हजार २७६ घरांचे बांधकाम करण्यात आले आहेत. तर यंदाच्या वर्षी २ हजार ८१२ घरांचे उद्दिष्ट असताना नाममात्र दोन घर बांधण्यात आल्याने गरजुंना घर देण्यास जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा कमी पडत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण व निवारा या पाच प्रत्येक व्यक्तीच्या महत्त्वाच्या मुलभूत गरजा आहेत. राबराब राबून रक्ताचे पाणी करूनही अनेकांना स्वत:चे पक्के घर बांधू शकत नसल्याचे वास्तव आहे. अशा गरजुंना वेळीच शासकीय मदतीचा हात देत त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वीत करण्यात आली.सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ३ हजार ५९२, शबरी आवास योजनेच्या माध्यमातून ३०२ तर रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून ७६६ घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. सदर तिनही योजनेतील सर्व घर बांधकामांसाठी संबंधितांकडून मंजुरीही मिळाली; पण सध्या स्थितीत केवळ प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून १ हजार ६०३, शबरी आवास योजनेच्या माध्यमातून १७८ तर रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून ४९५ घरांचे बांधकाम करण्यात आले आहे.सन २०१७-१८ या वर्षाकरिता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून १ हजार ९४६ व शबरी आवास योजनेच्या माध्यमातून १०० घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु, प्रशासनाने केवळ प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दोन घरांचे बांधकाम केल्याचे सांगण्यात येते.रमाई आवास योजना फसवीयंदाच्या वर्षी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधकामासाठी जिल्ह्याला एकही घर न बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याने जिल्ह्यातील गरजुंसाठी ही योजना फसवीच ठरत आहे. त्याबाबत अधिक विचारणा केली असता यंदा रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य नसल्याचे दिसून आले. घराबाबतचे अनेक प्रस्ताव सध्या विविध कार्यालयात धुळखात असून नागरिकांचे प्रस्ताव पुर्णत्वास नेण्याचे काम कासवगतीनेच होत असल्याचे दिसून येते.प्रधानमंत्री आवासची दोनच घरेसन २०१७-१८ या वर्षाकरिता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून १ हजार ९४६ घरे बांधायची होती. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात त्याचा गाजावाजा झाला. प्रसिद्धीवर लाखोंचा खर्च झाल्यानंतरही जिल्ह्यात योजनेचा बोजवारा निघाल्याचे दिसत आहे. या योजनेतील केवळ दोनच घरे बांधण्यात आल्याची माहिती आहे. या योजनेच्या प्रसिद्धीकरिता शासन कमी पडल्याचे यातून दिसत असून अर्ज करणाºयांना वास्तवात घर केव्हा मिळेल असा सवाल उपस्थित होत आहे.