शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

जिल्हा पुन्हा गारठला; पारा ९ अंशावर

By admin | Updated: January 23, 2016 02:12 IST

वातावरणात हवेचा दाब वाढताच थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. दोन दिवसांपासून किमान तापमान १२ ते १० अंशाच्या घरात आहे.

उत्तरेकडील लाटेचा प्रभाव : पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचे संकेतवर्धा : वातावरणात हवेचा दाब वाढताच थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. दोन दिवसांपासून किमान तापमान १२ ते १० अंशाच्या घरात आहे. यामुळे मध्यंतरी लोप पावलेल्या थंडीचा प्रभाव जाणवत आहे. एरव्ही रात्री उशीरापर्यंत शहरातील रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते; पण थंडीचा कडाका सुरू झाल्याने रात्री नऊ वाजेपर्यंत रस्ते ओस पडलेले असतात. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या लाटेमुळे पुढील दोन दिवस थंडीचा कडाका जाणवेल, असा अंजाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. हवेचा दाब वाढल्याने वातावरणात थंडीचे प्रमाण वाढत आहे. मध्यंतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडून वाहणारे थंड वारे अडत होते. परिणामी, थंडीचा प्रभाव ओसरला होता. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला. जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात उकाडा जाणवायला लागला होता. जानेवारी महिन्यात जाणवणारी थंडी ओसरल्याचा अनुभव येत होता. या काळात कमाल व किमान तापमानात वाढ झाली होती. कमाल तापमान ३०.९ अंशावर स्थिरावले होते तर किमान तापमान १८ अंशापर्यंत होते. किमान तापमानातही वाढ झाल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला होता. लोप पावलेली थंडी जाणवायला लागल्याने शेकोटी पेटवून थंडीचा आनंद लुटताना दिसत आहे.विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी उनी कपडे घालून कार्यावर जाताना दिसले. दिवसभर बाहेर पडताना नागरिकांनी उबदार कपडे घालूनच बाहेर पडणे पसंत केले. रात्रीच्या वेळी शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहे. यंदा हिवाळ्यातही तापमानाचा पारा १५ अंशांच्या वर स्थिरावल्याने थंडीचा प्रभाव कमीच जाणवत आहे. यातही डिसेंबर अखेरीस थंडीची चाहुल लागल्यावर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याचा प्रत्यय येत होता. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४५ पर्यंत असल्याने याचा परिणाम तापमान वाढीवर होऊन उकाडा जाणवायला लागल होता. यामुळे हिवाळ्यातच उनी कपड्यांचा व्यापारही थंडावला होता. थंडी पुन्हा स्थिरावत असल्याने जिल्हावासीय याचा आनंद घेताना दिसून येत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)