शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जि. प. सीईओंनी घेतला ‘उमेद’ अभियानाचा आढावा

By admin | Updated: August 1, 2016 00:33 IST

ग्रामीण भागातील द्रारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) सुरू केले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान : प्रत्येकाचे काम समजून घेत केले मार्गदर्शन वर्धा : ग्रामीण भागातील द्रारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) सुरू केले आहे. जिल्हास्तरावर अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे. अभियानाच्या माध्यमातून गावस्तरावर विविध गटांची बांधणी करण्यात येत आहे. अभियानांतर्गत सेलू तालुक्यातील वडगाव (जंगली) येथे उमेद अभियानाचे काम सुरू असून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी उमेद अभियानाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. जिल्हा स्तरावरून होणाऱ्या कामाची पाहणी व कार्यरत विविध समुदाय संसाधन व्यक्ती यांचे कार्य सीईओंनी जाणून घेतले. यावेळी जि.प. महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प.सदस्य वीणा वाळके, पं. स. सदस्य अर्चना मुडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक मनीष कावडे, प्रफुल इटाल, सोनाली भोकरे उपस्थित होते. जिल्ह्यात देवळी, सेलू, वर्धा तालुक्यांमध्ये एकूण ५ हजार ६९३ गट, ३३६ ग्रामसेवा संघ तर १७ प्रभाग संघ तयार करण्यात आले आहे. उमेद अंतर्गत गटांना सेवा देण्याकरिता गावातीलच समुदाय संसाधन व्यक्ती निवडण्यात आली असून त्याच्याद्वारे गावात गट व गाव विकासाचे काम सुरू आहे. याचीच पाहणी करण्याकरिता नयना गुंडे यांनी संध्या ग्रामसेवा संघ वडगाव(जंगली) येथे भेट देऊन अभियानाचे काम समजून घेतले. यामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती, प्रेरिका, लेखापाल, पशुसखी, कृषीसखी, समुदाय पशुधन व्यवस्थापक, वर्धिनी यांची कार्यप्रणाली समजून घेतली. तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे, युसुफ शेख, कुंदा देवतळे, शिल्पा मोरे, प्रभाग समन्वयक सुप्रिया कांबळे, ग्राम सचिव डोंगरे, नंदा करनाके, माधुरी श्रीराम, कलावती करनाके आदींनी सहकार्य केले. आभार आशा पेंदाम यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)