शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरी ८२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:32 IST

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी मतदान झाले. या मतदानाकरिता नागरिकांत उत्साह असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे८६ ग्रामपंचायतींकरिता झाले मतदान : ६०१ मतदारांचे भवितव्य मशीनबंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी मतदान झाले. या मतदानाकरिता नागरिकांत उत्साह असल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत झालेल्या नोंदीवरून मतदानाची टक्केवारी सरासरी ८२ वर जाईल, असे चित्र होते. दिवसभर मतदानादरम्यान कुठेही अप्रिय घटना घडल्याची माहिती नाही. एकंदरीत मतदानाची पक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले.आज झालेल्या मतदानाकरिता ९६ हजार ६०१ मतदारांना हक्क बजावयाचा होता. याची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. असे असताना सुमारे २० टक्के नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ६४.३१ टक्के मतदान झाल्याची नोंद होती. मतदानाकरिता अजूनही सुमारे दोन तासाचा कालावधी शिल्लक असल्याने हा आकडा सरासरी ८० टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दुपारी ३.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ५०.८६, सेलू ६६.४६, देवळी ६५.७७, आर्वी ६९.८६, आष्टी ७३.६५, कारंजा ६९.६७, हिंगणघाट ७१.८१ आणि समुद्रपूर येथे ७१.०५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या नोंदीनंतर सुमारे दोन तास आणखी मतदान होणार असल्याने ही टक्केवारी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. डिसेंबर महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतीकरिता आजचे मतदान होते. जिल्ह्यात तब्बल ११२ ग्रामपंचायतीत निवडणूक होणार होती; मात्र चिन्ह वाटपाच्या कारणावरून सेलू तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली. यामुळे ८६ ग्रा.पं. करिता मतदान झाले. मतदानाच्या प्रक्रियेत कोणतीही गडबड होणार नाही याची दक्षता घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. एकूण २७८ मतदान केंद्र सज्ज करण्यात आले होते. या केंद्रात सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. सर्वच केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले. कुठूनही काही वाद किंवा कुण्या उमेदवारात वाद झाल्याची माहिती नव्हती.सरपंचपदाचे ३०२ तर ६०१ सदस्यांचे भाग्य आज फळफळणारगावाच्या विकासाचे सर्व अधिकारी ग्रामपंचायतीला देण्यात आल्याने सरपंचपद महत्त्वाचे झाले आहे. यामुळे या पदाकरिता अनेकांनी दावेदारी दाखल केली आहे. प्रत्येकालाच आपला विजय सहज दिसत असल्याचे प्रचाराच्या काळात त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते. या उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ते मंगळवारी होणाºया मोजणीतून समोर येईलच.तालुका स्थळावर होणार मतमोजणीआज झालेल्या मतदानाची मोजणी उद्या मंगळवारी सकाळी १० वाजतापासून होणार आहे. ही मोजणी तालुका स्थळावर होणार असून याकरिता प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वर्धा, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी आणि कारंजा येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. तर सेलू येथे दिपचंद विद्यालय आणि आर्वी येथे गांधी विद्यालयात मतमोजणी होणार आहे.आठही तालुक्यात होत असलेली ही मोजणी एकूण ७४ टेबलवरून होणार आहे. यात वर्धा तीन, सेलू दोन, देवळी १२, आर्वी नऊ, आष्टी तीन, कारंजा सहा, हिंगणघाट सहा, समुद्रपूर तीन असे टेबल लावण्यात आले आहेत. या टेबलवर एक पर्यवेक्षक आणि एक सहायक, असे ८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. काही अडचण आल्यास २० कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या कामाकरिता एकूण १०८ कर्मचाºयांना नियुक्त करण्यात आले आहे.मतमोजणी दुपारपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त राहणार आहे.जीप चालकावर गुन्हानिवडणुकीतील वाहनाच्या गैरवापराचा ठपकालोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात तहसीलदारांनी कृषी विभागाची जीप गाडी निवडणूक कामात वापरण्यासाठी रितसर घेतली असताना ती नियोजित ठिकाणी न ठेवता चालकाने परस्पर तिचा वापर केला. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून घोडमारे विरूद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तहसीलदारांच्या आदेशान्वये आवश्यकतेनुसार कृषी विभागाचे एमएच ३२ जे २७० क्रमांकाचे वाहन निवडणूक कामात वापरण्यासाठी असताना त्यावरील चालकाने ते परस्पर इतरत्र नेले. या कारणावरून चालकाने निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरूद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली. सेलू पोलिसांकडून भादंविच्या कलम १८८ व लोकप्रतिनिधी कायदा १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. या निवडणुकीत सेलू तालुका या ना त्या कारणाने चर्चेतच राहिल्याचे दिसून आले.