शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जिल्ह्यात सरासरी ८२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:32 IST

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी मतदान झाले. या मतदानाकरिता नागरिकांत उत्साह असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे८६ ग्रामपंचायतींकरिता झाले मतदान : ६०१ मतदारांचे भवितव्य मशीनबंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी मतदान झाले. या मतदानाकरिता नागरिकांत उत्साह असल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत झालेल्या नोंदीवरून मतदानाची टक्केवारी सरासरी ८२ वर जाईल, असे चित्र होते. दिवसभर मतदानादरम्यान कुठेही अप्रिय घटना घडल्याची माहिती नाही. एकंदरीत मतदानाची पक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले.आज झालेल्या मतदानाकरिता ९६ हजार ६०१ मतदारांना हक्क बजावयाचा होता. याची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. असे असताना सुमारे २० टक्के नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ६४.३१ टक्के मतदान झाल्याची नोंद होती. मतदानाकरिता अजूनही सुमारे दोन तासाचा कालावधी शिल्लक असल्याने हा आकडा सरासरी ८० टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दुपारी ३.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ५०.८६, सेलू ६६.४६, देवळी ६५.७७, आर्वी ६९.८६, आष्टी ७३.६५, कारंजा ६९.६७, हिंगणघाट ७१.८१ आणि समुद्रपूर येथे ७१.०५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या नोंदीनंतर सुमारे दोन तास आणखी मतदान होणार असल्याने ही टक्केवारी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. डिसेंबर महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतीकरिता आजचे मतदान होते. जिल्ह्यात तब्बल ११२ ग्रामपंचायतीत निवडणूक होणार होती; मात्र चिन्ह वाटपाच्या कारणावरून सेलू तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली. यामुळे ८६ ग्रा.पं. करिता मतदान झाले. मतदानाच्या प्रक्रियेत कोणतीही गडबड होणार नाही याची दक्षता घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. एकूण २७८ मतदान केंद्र सज्ज करण्यात आले होते. या केंद्रात सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. सर्वच केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले. कुठूनही काही वाद किंवा कुण्या उमेदवारात वाद झाल्याची माहिती नव्हती.सरपंचपदाचे ३०२ तर ६०१ सदस्यांचे भाग्य आज फळफळणारगावाच्या विकासाचे सर्व अधिकारी ग्रामपंचायतीला देण्यात आल्याने सरपंचपद महत्त्वाचे झाले आहे. यामुळे या पदाकरिता अनेकांनी दावेदारी दाखल केली आहे. प्रत्येकालाच आपला विजय सहज दिसत असल्याचे प्रचाराच्या काळात त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते. या उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ते मंगळवारी होणाºया मोजणीतून समोर येईलच.तालुका स्थळावर होणार मतमोजणीआज झालेल्या मतदानाची मोजणी उद्या मंगळवारी सकाळी १० वाजतापासून होणार आहे. ही मोजणी तालुका स्थळावर होणार असून याकरिता प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वर्धा, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी आणि कारंजा येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. तर सेलू येथे दिपचंद विद्यालय आणि आर्वी येथे गांधी विद्यालयात मतमोजणी होणार आहे.आठही तालुक्यात होत असलेली ही मोजणी एकूण ७४ टेबलवरून होणार आहे. यात वर्धा तीन, सेलू दोन, देवळी १२, आर्वी नऊ, आष्टी तीन, कारंजा सहा, हिंगणघाट सहा, समुद्रपूर तीन असे टेबल लावण्यात आले आहेत. या टेबलवर एक पर्यवेक्षक आणि एक सहायक, असे ८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. काही अडचण आल्यास २० कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या कामाकरिता एकूण १०८ कर्मचाºयांना नियुक्त करण्यात आले आहे.मतमोजणी दुपारपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त राहणार आहे.जीप चालकावर गुन्हानिवडणुकीतील वाहनाच्या गैरवापराचा ठपकालोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात तहसीलदारांनी कृषी विभागाची जीप गाडी निवडणूक कामात वापरण्यासाठी रितसर घेतली असताना ती नियोजित ठिकाणी न ठेवता चालकाने परस्पर तिचा वापर केला. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून घोडमारे विरूद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तहसीलदारांच्या आदेशान्वये आवश्यकतेनुसार कृषी विभागाचे एमएच ३२ जे २७० क्रमांकाचे वाहन निवडणूक कामात वापरण्यासाठी असताना त्यावरील चालकाने ते परस्पर इतरत्र नेले. या कारणावरून चालकाने निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरूद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली. सेलू पोलिसांकडून भादंविच्या कलम १८८ व लोकप्रतिनिधी कायदा १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. या निवडणुकीत सेलू तालुका या ना त्या कारणाने चर्चेतच राहिल्याचे दिसून आले.