शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खाकीचे भय हरले, अवैध धंदेवाईकांचे उंचावले मनोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 21:39 IST

जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देदारूबंदी कार्यकर्त्यांवर हल्ले। कायदा, सुव्यवस्था पणाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे.जिल्ह्यात दारूबंदी आहे; मात्र सर्वत्र दारूचे पाट वाहतात. शहरात विदेशीचा बोलबाला, तर गावखेड्यात गावठी दारूभट्टीचा धूर निघतो. मात्र, दारू कायमस्वरूपी हद्दपार करण्याकरिता पोलिस विभागाचे प्रयत्न थिटे पडत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार हाती घेताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावागावांत ग्रामरक्षक दलाची स्थापना करून पोलिस विभागालाही दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनीही नव्याची नवलाई म्हणून शहरातील पोद्दार बगिचा परिसरातील एका बड्या दारूविक्रेत्यावर छापा घालून कारवाई केली. इतर दारूविक्रेत्यांवर कारवाईचे काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलिस विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने सद्यस्थितीत शहरातील विविध भागांत दारूचे गुत्थे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई केलेला बंद खोलीतील ‘तो’ बार परत सुरू झाल्याची माहिती आहे. शहरात अनेकांनी अशाच प्रकारे बंद खोलीत बार थाटले आहेत. असे असताना केवळ एका-दोघांवर कारवाई करून पोलिस विभाग नामानिराळा झाला. हिंगणघाट येथे तिघा दारूविक्रेत्यांनी दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केला.यापूर्वीही पोलिस कर्मचारी आणि सर्वसामान्यांवर दारूविक्रेत्यांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. पालकमंत्र्यांनी दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना पोलिस विभाग सुस्त आहे. कठोर कारवाईअभावी दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले असून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देत दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.डीबी पथके बनली वसुली पथकेशहरात शहर आणि रामनगर ठाण्याची डीबी पथके आहेत. या पथकांचा दारूविक्रेत्यांकडून वसुलीचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. एका दारूविक्रेत्याकडून महिन्याकाठी २० ते २५ हजारांची रक्कम वसूल केली जात आहे. या पथकांनी पैसे द्या आणि व्यवसाय सुरू करा, अशी मुभाच विक्रेत्यांना दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी