शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

जिल्ह्यात खाकीचे भय हरले, अवैध धंदेवाईकांचे उंचावले मनोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 21:39 IST

जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देदारूबंदी कार्यकर्त्यांवर हल्ले। कायदा, सुव्यवस्था पणाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे.जिल्ह्यात दारूबंदी आहे; मात्र सर्वत्र दारूचे पाट वाहतात. शहरात विदेशीचा बोलबाला, तर गावखेड्यात गावठी दारूभट्टीचा धूर निघतो. मात्र, दारू कायमस्वरूपी हद्दपार करण्याकरिता पोलिस विभागाचे प्रयत्न थिटे पडत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार हाती घेताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावागावांत ग्रामरक्षक दलाची स्थापना करून पोलिस विभागालाही दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनीही नव्याची नवलाई म्हणून शहरातील पोद्दार बगिचा परिसरातील एका बड्या दारूविक्रेत्यावर छापा घालून कारवाई केली. इतर दारूविक्रेत्यांवर कारवाईचे काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलिस विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने सद्यस्थितीत शहरातील विविध भागांत दारूचे गुत्थे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई केलेला बंद खोलीतील ‘तो’ बार परत सुरू झाल्याची माहिती आहे. शहरात अनेकांनी अशाच प्रकारे बंद खोलीत बार थाटले आहेत. असे असताना केवळ एका-दोघांवर कारवाई करून पोलिस विभाग नामानिराळा झाला. हिंगणघाट येथे तिघा दारूविक्रेत्यांनी दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केला.यापूर्वीही पोलिस कर्मचारी आणि सर्वसामान्यांवर दारूविक्रेत्यांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. पालकमंत्र्यांनी दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना पोलिस विभाग सुस्त आहे. कठोर कारवाईअभावी दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले असून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देत दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.डीबी पथके बनली वसुली पथकेशहरात शहर आणि रामनगर ठाण्याची डीबी पथके आहेत. या पथकांचा दारूविक्रेत्यांकडून वसुलीचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. एका दारूविक्रेत्याकडून महिन्याकाठी २० ते २५ हजारांची रक्कम वसूल केली जात आहे. या पथकांनी पैसे द्या आणि व्यवसाय सुरू करा, अशी मुभाच विक्रेत्यांना दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी