शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

जिल्हा दुष्काळग्रस्त पण, प्रशासनाच्या लेखी सुकाळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:23 IST

Government Wardha News सततचा पाऊस आणि रोगाच्या प्रकोपामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात होरपळ होत असतानाही प्रशासनाच्या लेखी सुकाळ असल्याचे चित्र सुधारित आणेवारीवरुन अधोरेखित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराजकीय पक्षांनी घेतला आक्षेप केवळ ४६३ गावांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सततचा पाऊस आणि रोगाच्या प्रकोपामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात होरपळ होत असतानाही प्रशासनाच्या लेखी सुकाळ असल्याचे चित्र सुधारित आणेवारीवरुन अधोरेखित करण्यात आले आहे. आठही तालुक्यातील केवळ ४६३ गावांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत तर ८७५ गावातील आणेवारी ५० च्यावर असल्याचे दर्शविल्याने या आणेवारीवर राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदविला आहे.

जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. निसर्गकोप आणि रोगांचा प्रादुर्भात यामुळे सोयाबीनच्या पिकांचा जबर फटका बसला. तसेच कपाशीचे पीकही हातचे जाण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिंधींकडून पंचनामे करण्याची मागणी होत असतानाही कृषी विभाग निद्रावस्थेत आहे. कृषी विभागाच्या या कुंभकर्णी झोपेमुळेच बोगस बियाण्यांच्या सुळसुळाट झाला. शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचे संकट पेलावे लागले.

जिल्ह्यात सर्वत्रच दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना शासनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३० सप्टेंबरपर्यंत नजरअंदाज तर ३१ ऑक्टोबरपर्यंत सुधािरत आणेवारी काढली असता प्रशासनाच्या लेखी १ हजार ३३८ गावांपैकी ८७५ गावांत ५० पैशावर तर ४६३ गावांतील आणेवारी ५० पैशांच्या आत नमूद करण्यात करण्यात आली. त्यामुळे ही आणेवारी फसवी असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून होत असून ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम आणेवारीत ही आकडेवारी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

 मी हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी व वर्धा तालुक्यात फिरलो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  शेतकऱ्यांशी संवाद साधला असता कुठेही समाधानकारक परिस्थिती नाही. सर्व पीक उद्‌ध्वस्त झाले असून उत्पादनाची काहीच शास्वती नाही. अशाही स्थितीत प्रशासनाची आणेवारी ५० पैश्याच्या वर निघेतच कशी, हा प्रश्न आहे. यावरुन प्रशासनाने टेबलावर बसूनच अहवाल तयार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला याबाबत जाब विचारला जाईल.- अभिजित फाळके,  संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी

हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक पाहणी केली. सोयाबीनही गेले आता कपाशीवरही बोंडअळींने आक्रमण केल्याने कपाशीही उद्‌ध्वस्त झाली आहे. पण, अद्यापही पंचनामे झाले नाही, ही शोकांतिका आहे. त्यातच प्रशासनाची आणेवारी चक्रावून टाकणारी असल्याने हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे बांधावर जाऊन पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी.- समीर कुणावार, आमदार

टॅग्स :agricultureशेती