शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

जिल्हा न्यायालयाचा जप्ती आदेश; जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ!

By महेश सायखेडे | Updated: April 3, 2023 17:06 IST

जिल्हा शल्य चिकित्सकांनी अडीच लाख दिल्याने टळली कारवाईची नामुष्की

वर्धा : नवीन आर्थिक वर्षाचा चतुर्थ दिन असलेल्या सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालयाचा जप्ती आदेश धडकल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे येताच त्यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांना आपल्या दालनात पाचारण केले. त्यानंतर याचिकाकर्त्याला अडीच लाखांची रक्कम देण्यात आल्याने जप्तीची कारवाई टळली.

आर्वी येथील रहिवासी विवेकानंद कासार यांची सन २००२ मध्ये प्रकृती बिघडल्याने त्यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले. त्यानंतर विवेकानंद यांच्या हाताला गंभीर दुखापत होत त्यांचा हात कापावा लागल्याने त्यांना अपंगत्व आले. चुकीच्या उपचारामुळे आपला हात कापावा लागला, असा आरोप करीत विवेकानंद कासार यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.

दोन्ही बाजू लक्षात घेऊन २०१४ मध्ये जिल्हा न्यायालयाने विवेकानंद कासार यांच्या बाजूने निर्णय दिला. शिवाय, विवेकानंद कासार यांना नुकसानभरपाई म्हणून सुमारे ६.७३ लाख रुपये देण्याचे आदेश दिलेत. बराच कालावधी लोटूनही नुकसानभरपाईची रक्कम न मिळाल्याने विवेकानंद कासार यांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. याच याचिकेवर सुनावणी होत न्यायालयाने विवेकानंद कासार यांच्या बाजूने निर्णय देत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने जप्तीचा आदेश दिल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. हाच आदेश घेऊन सोमवारी विवेकानंद कासार हे न्यायालयाच्या बेलिफ यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सकारात्मक चर्चेअंती जिल्हा शल्य चिकित्सकांकडून याचिकाकर्ते विवेकानंद कासार यांना नुकसानभरपाईच्या रकमेपैकी अडीच लाख देण्याचे निश्चित झाल्याने जप्तीची नामुष्की टळली, हे विशेष.

गुप्तता बाळगण्यात मानली गेली धन्यता

नेमक्या कुठल्या विषयी ही जप्तीची नामुष्की ओढावली आणि आता काय कार्यवाही केली जाईल याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्याची प्रत्यक्ष भेटून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नेहमीप्रमाणे त्यांनी भेटण्यासह बोलण्याचेही टाळले. एकूणच जिल्हा शल्य चिकित्सकांकडून या प्रकरणी कुठलीही माहिती प्रसार माध्यमांकडे जाऊ नये याबाबत मोठी गुप्तता बाळगण्यात आली.अडीच लाख मिळाले उर्वरित रकमेचे काय?

जप्तीचा आदेश धडकताच जिल्हाकचेरीत एकच खळबळ उडाली होती. सोमवारी याचिकाकर्ते विवेकानंद कासार यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तातडीने अडीच लाख रुपये देण्यात आले. पण नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम कशी आणि कधी मिळणार, हे जिल्हा शल्यचिकित्सकांनी बोलण्याचे टाळल्याने कळू शकले नाही.

सन २००२ मध्ये प्रकृती बिघडल्याने विवेकानंद कासार हे आर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. येथील चुकीच्या उपचारामुळे विवेकानंद कासार यांना एक हात गमवावा लागल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. संबंधित प्रकरणी न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून विवेकानंद कासार यांना सुमारे ६.७३ लाख देण्याचा आदेश सन २०१४ मध्ये दिला. बराच कालावधी लोटून नुकसानभरपाईची रक्कम न मिळाल्याने विवेकानंद कासार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जप्तीचा आदेश दिला. तोच आदेश घेऊन याचिकाकर्ते विवेकानंद कासार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेत. त्यांना तातडीने अडीच लाख रुपये देण्यात आले आहे.

- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.