शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

यशवंतराव दाते स्मृती पुरस्काराचे वितरण

By admin | Updated: February 4, 2017 00:22 IST

येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

व्हाया सावरगाव खुर्द कादंबरीला पुरस्कार : सुनीता कावळे व राजेंद्र मुंढे यांचाही सत्कार वर्धा : येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ८४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक डॉ किशोर सानप, अध्यक्ष प्रदीप दाते, कादंबरीकार दिनकर दाभाडे, कथाकार गणेश मतकरी, विनोदी कथाकार किशोर बळी, लेखिका सुचिता खल्लाळ, समीक्षक डॉ मनोज तायडे आणि पुरस्कार समिती संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. लेखकाला आपआपली दुनिया तयार करावी लागते. साहित्य हे माणसाला माणसात आणते. साहित्य परिवर्तनाचे साक्षीदार असते. वेदना आणि प्रतिमेचा संगम असतो, साहित्य निर्मिती वेडेपणातून जन्माला येत असते, शहाणपण कायम ठेऊन चांगली कलाकृतीची निमिती होत नसते. यासाठी अस्सल जीवनानुभव घ्यावा लागतो, तोच घेण्यात मराठी साहित्यिक थिटा पडतो आहे असे वाटते, असे प्रतिपादन ८४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. ते येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या व्यख्यानमालेचे साहित्य आणि समाज याविषयावर २९ वे पुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी कांबळे यांच्या हस्ते आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी साहित्य पुरस्कार बुलडाणा येथील दिनकर दाभाडे यांच्या 'व्हाया सावरगाव खुर्द' या कादंबरीला, शिक्षणमहर्षी बापूराव देशमुख कथासंग्रह पुरस्कार मुंबई येथील गणेश मतकरी यांच्या 'इन्स्टॉलेशन्स' या कथासंग्रहाला, संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार अकोल्याचे कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या तूको बादशहा या काव्यसंग्रहाला, भावराव शिंगाडे स्मृती विनोदी साहित्य पुरस्कार अकोल्याचे किशोर बळी यांच्या 'धुम्मस' या विनोदी कथासंग्रहाला पाहुण्याच्या हस्ते रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात प्रदान करण्यात आले. अंजनाबाई इंगळे स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कार नांदेडच्या सुचिता खल्लाळ यांच्या स्त्री कवितेचं भान- काल आणि आज या समीक्षाग्रंथासाठी रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र दिले. हरीश मोकलकर स्मृतीत दिला जाणारा सामाजिक ऋण पुरस्कार यवतमाळचे अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यावतीने त्यांचे बंधू अमित यांनी स्वीकारला. या प्रसंगी स्थानिक बालसाहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. सुनीता कावळे यांचा त्यांच्या आजवरच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे यांचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून उत्तम कांबळे यांच्या साहित्याचा चिकित्सात्मक अभ्यास याविषयावर आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मानपत्र व प्रतीकचिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समीक्षक डॉ. किशोर सानप यांनी केले. पुरस्काराविषयी डॉ. राजेंद्र मुंढे यांनी सांगितले. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी तर आभार प्रदीप दाते यांनी मानले. या कार्यक्रमाला विदभार्तून साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या आयोजनात प्रशांत पनवेलकर, प्रा उल्हास लोहकरे, रंजना दाते, संगीता इंगळे, संजय टोणपे, आकाश दाते, सुरेश वानखेडे, प्रफुल्ल दाते, पंडित देशमुख यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)