शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण ठरतेय ग्राहकांसाठी ‘मरण’ वितरण

By admin | Updated: June 25, 2014 00:36 IST

महावितरणचे ग्रामीण भागातील मोठे कार्यालय येथे आहे़ कवडघाट ते अल्लीपूर व अल्लीपूर ते मनसावळीपर्यंतच्या सर्व ३० ते ४० गावांचा कारभार चालविला आहे़ यात ५ हजार विद्युत ग्राहक असून कोट्यवधींचे

कर्मचाऱ्यांचा अभाव : भाडोत्रींवर चालतो कारभारअल्लीपूर : महावितरणचे ग्रामीण भागातील मोठे कार्यालय येथे आहे़ कवडघाट ते अल्लीपूर व अल्लीपूर ते मनसावळीपर्यंतच्या सर्व ३० ते ४० गावांचा कारभार चालविला आहे़ यात ५ हजार विद्युत ग्राहक असून कोट्यवधींचे उत्पन्न आहे़ असे असले तरी सेवेच्या नावावर मात्र बोंबच आहे़ यामुळे महावितरण ग्राहकांसाठी ‘मरण’वितरण ठरू पाहत आहे़कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने ग्राहकांना वितरणला झटका बसत आहे़ शाखा अभियंता कार्यालयात विजेची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी हाताशी घेतले जातात़ त्यांना स्वत:च मजुरी देत कार्यालय व लाईनचे मेंटनन्स व अर्जंट कामे करून घेतली जातात़ हे करीत असताना अभियंत्याचीच तारांबळ उडते तर सामान्य जनतेच्या तक्रारी कशा सोडविणार, हा प्रश्नच आहे़ अनेक गावातील खांब वाकले़ काही शेतात तारा पडून आहे़ अनेक शेतकऱ्यांचे पंप विजेअभावी बंद आहे. कार्यालयात ३ ते ४ कर्मचारी आहेत़ ते कधी येतात व जातात, याचा पत्ता नसतो. केवळ सही करणे व पानटपऱ्या राखणे एवढेच काम ते करीत असल्याचे दिसते़ आहे ते कर्मचारी खांबावर चढू शकतील, असे नाहीत़ वयोवृद्ध असल्याने तक्रारींची पूर्तता होत नाही. नाईलाज म्हणून खासगी लाईनमनकडून कामे करून घ्यावी लागतात़ तक्रारींचे निवाराण होत नसल्याने कुणी ग्राहकही कार्यालयात जात नाही़ पाणी येत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ठिंबक, स्प्रिंकलर लावण्याची घाई आहे; पण विद्युत तारा जमिनीवर लोळण घेत असल्याने ओलित कसे करणार, हा प्रश्नच आहे़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)