शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

महावितरण ठरतेय ग्राहकांसाठी ‘मरण’ वितरण

By admin | Updated: June 25, 2014 00:36 IST

महावितरणचे ग्रामीण भागातील मोठे कार्यालय येथे आहे़ कवडघाट ते अल्लीपूर व अल्लीपूर ते मनसावळीपर्यंतच्या सर्व ३० ते ४० गावांचा कारभार चालविला आहे़ यात ५ हजार विद्युत ग्राहक असून कोट्यवधींचे

कर्मचाऱ्यांचा अभाव : भाडोत्रींवर चालतो कारभारअल्लीपूर : महावितरणचे ग्रामीण भागातील मोठे कार्यालय येथे आहे़ कवडघाट ते अल्लीपूर व अल्लीपूर ते मनसावळीपर्यंतच्या सर्व ३० ते ४० गावांचा कारभार चालविला आहे़ यात ५ हजार विद्युत ग्राहक असून कोट्यवधींचे उत्पन्न आहे़ असे असले तरी सेवेच्या नावावर मात्र बोंबच आहे़ यामुळे महावितरण ग्राहकांसाठी ‘मरण’वितरण ठरू पाहत आहे़कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने ग्राहकांना वितरणला झटका बसत आहे़ शाखा अभियंता कार्यालयात विजेची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी हाताशी घेतले जातात़ त्यांना स्वत:च मजुरी देत कार्यालय व लाईनचे मेंटनन्स व अर्जंट कामे करून घेतली जातात़ हे करीत असताना अभियंत्याचीच तारांबळ उडते तर सामान्य जनतेच्या तक्रारी कशा सोडविणार, हा प्रश्नच आहे़ अनेक गावातील खांब वाकले़ काही शेतात तारा पडून आहे़ अनेक शेतकऱ्यांचे पंप विजेअभावी बंद आहे. कार्यालयात ३ ते ४ कर्मचारी आहेत़ ते कधी येतात व जातात, याचा पत्ता नसतो. केवळ सही करणे व पानटपऱ्या राखणे एवढेच काम ते करीत असल्याचे दिसते़ आहे ते कर्मचारी खांबावर चढू शकतील, असे नाहीत़ वयोवृद्ध असल्याने तक्रारींची पूर्तता होत नाही. नाईलाज म्हणून खासगी लाईनमनकडून कामे करून घ्यावी लागतात़ तक्रारींचे निवाराण होत नसल्याने कुणी ग्राहकही कार्यालयात जात नाही़ पाणी येत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ठिंबक, स्प्रिंकलर लावण्याची घाई आहे; पण विद्युत तारा जमिनीवर लोळण घेत असल्याने ओलित कसे करणार, हा प्रश्नच आहे़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)