शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

महावितरण ठरतेय ग्राहकांसाठी ‘मरण’ वितरण

By admin | Updated: June 25, 2014 00:36 IST

महावितरणचे ग्रामीण भागातील मोठे कार्यालय येथे आहे़ कवडघाट ते अल्लीपूर व अल्लीपूर ते मनसावळीपर्यंतच्या सर्व ३० ते ४० गावांचा कारभार चालविला आहे़ यात ५ हजार विद्युत ग्राहक असून कोट्यवधींचे

कर्मचाऱ्यांचा अभाव : भाडोत्रींवर चालतो कारभारअल्लीपूर : महावितरणचे ग्रामीण भागातील मोठे कार्यालय येथे आहे़ कवडघाट ते अल्लीपूर व अल्लीपूर ते मनसावळीपर्यंतच्या सर्व ३० ते ४० गावांचा कारभार चालविला आहे़ यात ५ हजार विद्युत ग्राहक असून कोट्यवधींचे उत्पन्न आहे़ असे असले तरी सेवेच्या नावावर मात्र बोंबच आहे़ यामुळे महावितरण ग्राहकांसाठी ‘मरण’वितरण ठरू पाहत आहे़कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने ग्राहकांना वितरणला झटका बसत आहे़ शाखा अभियंता कार्यालयात विजेची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी हाताशी घेतले जातात़ त्यांना स्वत:च मजुरी देत कार्यालय व लाईनचे मेंटनन्स व अर्जंट कामे करून घेतली जातात़ हे करीत असताना अभियंत्याचीच तारांबळ उडते तर सामान्य जनतेच्या तक्रारी कशा सोडविणार, हा प्रश्नच आहे़ अनेक गावातील खांब वाकले़ काही शेतात तारा पडून आहे़ अनेक शेतकऱ्यांचे पंप विजेअभावी बंद आहे. कार्यालयात ३ ते ४ कर्मचारी आहेत़ ते कधी येतात व जातात, याचा पत्ता नसतो. केवळ सही करणे व पानटपऱ्या राखणे एवढेच काम ते करीत असल्याचे दिसते़ आहे ते कर्मचारी खांबावर चढू शकतील, असे नाहीत़ वयोवृद्ध असल्याने तक्रारींची पूर्तता होत नाही. नाईलाज म्हणून खासगी लाईनमनकडून कामे करून घ्यावी लागतात़ तक्रारींचे निवाराण होत नसल्याने कुणी ग्राहकही कार्यालयात जात नाही़ पाणी येत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ठिंबक, स्प्रिंकलर लावण्याची घाई आहे; पण विद्युत तारा जमिनीवर लोळण घेत असल्याने ओलित कसे करणार, हा प्रश्नच आहे़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)