शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वितरिका, सायपण, पाटचºयांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:29 IST

बोर प्रकल्पाचे पाणी रबी हंगामासाठी सोडण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. असे असले तरी वितरिका, सायपण व पाटचºयांची दुरवस्था कायम आहे.

ठळक मुद्देओलितासाठी कसरत कायमच : शेवटच्या शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता धूसर

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : बोर प्रकल्पाचे पाणी रबी हंगामासाठी सोडण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. असे असले तरी वितरिका, सायपण व पाटचºयांची दुरवस्था कायम आहे. यामुळे शेतकºयांना शेतात पाणी नेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शेवटच्या शेतकºयापर्यंत यंदाही पाणी पोहोचणार की नाही, याबाबत साशंकताच आहे.बोरधरण प्रकल्पाचा कालवा, पाटचºया, वितरिका व सायपणच्या निर्मितीला ५० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. तेव्हा केलेल्या वितरिका सध्या गाळाने पूर्णत: बुजल्या आहे. यात वाढलेली झाडे झुडपे पाण्याचा प्रवाह रोखण्यास कारणीभूत ठरत असताना पाटबंधारे विभागाद्वारे नावापूरता जेसीबी लावून कुठे १० फुट तर कुठे २० फुट वितरिका उखरून सफाईचा देखावा करण्यात आला. सायपणपवरून शेतात ओलितासाठी पाणी नेताना शेतकºयांना पुन्हा याही हंगामात टिनपत्रे वा गोट्यांची पाळ लावावी लागेल, हे वास्तव आहे. पाटचºया पाझरत असल्याने अनेकांच्या शेतातील पिकांचे नुकसान होते. शेतकरी दरवर्षी अर्ज करतात; पण त्या पाटचºयांकडे लक्ष देण्यास अधिकाºयांना वेळ नाही. नावाला पाणी सोडणे, ते शेतकºयांनीच घेणे, कर्मचारी नसणे यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय कसा रोखला जाणार, हे एक कोडेच आहे. कर्मचाºयांची कमतरता आहे; पण धरणाचे पाणी ओलितासाठी देण्याचा मुख्य उद्देश्य ५० वर्षांतही सफल झाला नाही. अद्यापही शेवटच्या शेतकºयांच्या शेतात पाटाचे पाणी पोहोचलेलेच नाही, ही शोकांतिका आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी तथा लोकप्रतिनिधींनी लक्ष देत संपूर्ण वितरिकांची दुरूस्त करावी, अशी मागणी आहे.मदन प्रकल्पाचे पाणी आजपासून शेतकºयांना मिळणारवर्धा - मदन प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रात येणाºया शेतकºयांना रबी पिकासाठी गुरुवारपासून पाणी सोडण्यात येत आहे. याबाबत जामणी येथील महात्मा साखर कारखाना येथे सभा घेण्यात आली. सभेला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, माधव कोटस्थाने, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष अशोक वैरागडे, भाजप सेलू तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, पं.स. सदस्य बंडू गव्हाळे, उपविभागीय अभियंता रा.ज. राणा, स. अभियंता शारिक सोळंकी, संकेत लोखंडे, राजेश देशमुख, शाखा अभियंता धनवीज व शेतकरी उपस्थित होते..मदन तलाव प्रकल्पात १३.२६ दलघमी पाणीसाठा असून धरण १०० टक्के भरले आहे. रबी पिकासाठी ८.७४ दलघमी साठा उपलब्ध आहे. रबीचे १२९६ हेक्टर क्षेत्र गृहित धरले असून कापूस ६०० हेक्टर, गहू ३०० व चना ३९६ हे संभाव्य आहे. रबीसाठी १५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, २३ डिसेंबर ते ३ जानेवारी, १८ ते २९ जानेवारी व १७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत पाणी सोडले जाणार आहे. कालव्यातील गाळ व गवत काढण्यासाठी जेसीबी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. येळाकेळी जि.प. सर्कलमध्ये पाणी उपलब्ध होणार असल्याने उत्पादनात वाढ होणार आहे. सभेला सुधीर देशमुख, गौळकार, बाळासाहेब ढोडीकर, ढगे, दिलीप पिंपळे, अरुण चिचघरे व शेतकरी हजर होते.बोरधरणातून सोडणार चार वेळ पाणीबोरधरण : सिंचन विभागाद्वारे रबी हंगामात बोरधरण येथून चार वेळा पाणी सोडले जाणार असल्याची माहिती बोरधरण येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले. ही बैठक मंगळवारी झाली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता एल.पी. इंगळे, पं.स. सभापती जयश्री खोडे, जि.प. सभापती सोनाली कलोडे, हिंगणीच्या सरपंच शुभांगी मुडे, उपविभागीय अभियंता भालेराव, घोराड, बोरी, हमदापूर, हिंगणीचे शेतकरी उपस्थित होते. शेतकºयांच्या मागणीनुसार पहिले पाणी गुरूवारी सोडले जात आहे. यंदा शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाने घेतल्याचे काळे यांनी सांगितले.