शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामगीता अध्ययनातून व्यसनमुक्ती शक्य

By admin | Updated: January 17, 2015 23:04 IST

तरूण वर्ग शिक्षित झाला, पण त्यांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीमुळे युवकांचा मानसिक तोल ढासळत आहे. यातूनच व्यसन जडते. स्व्यसनापासून समाजाला वाचवायचे असेल तर

वर्धा : तरूण वर्ग शिक्षित झाला, पण त्यांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीमुळे युवकांचा मानसिक तोल ढासळत आहे. यातूनच व्यसन जडते. स्व्यसनापासून समाजाला वाचवायचे असेल तर ग्रामगितचे अध्ययन गाव पातळीपासून व्हायला हवे, ग्रामगितेत समता, बंधुत्व, सलोखा नांदविण्याचे प्रमाण आहे, असे मत मार्गदर्शक अजय डोंगरे यांनी केले.समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर येथे डॉ. सुभाषदादा विदर्भ ग्रामीण संस्था आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बालगोपाल पुरूष बचत गट, सावित्रीबाई महिला बचत गट, रमाई महिला बचत गट यांचा सहभाग होता. यानंतर ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच शुभांगी घुगस होत्या. उद्घाटक हिरा खडसे, प्रमुख पाहुणे प्राथमिक आरोग्य केंद्र, नंदोरीचे डॉ. सुने, पोलीस निरीक्षक समुद्रपूर जिट्टेवार, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक धनराज घोडे, दिनेश खडसे आदी मान्यवर होते. यानंतर सामुहिक ग्रामगिता अध्यायाचे वाचन करण्यात आले. युवकांनी व्यसन करू नये म्हणून सामूहिक संकल्प केला. कार्यक्रमाला बचत गटातील जयश्री दाते, करिश्मा दाते, रंजना सोंगे, मंगला खडसे, राजू खंडार, राजेंद्र दाते, संगिता खंडार, कमला जोगे, सुनिता दाते, अनुसया घुगसे, सुमन मेंढे, जिजा खडतकर, नलिनी मुंजेवार, रवीना पाटील, ज्योत्स्ना गाताडे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)