शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जंक्शन जलवाहिनी फूटल्याने पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:24 IST

शहरात सध्या भूमिगत गटारवाहिनी टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे. असेच खोदकाम आर्वी मार्गावर केळकरवाडी परिसरात सुरू असताना अचानक जंक्शन जलवाहिनी फूटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

ठळक मुद्देम्हणे अंदाज चुकला : १९९८ पासून मेंटेनन्स निघालेच नसून जुन्या जलवाहिनीचा नकाशाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात सध्या भूमिगत गटारवाहिनी टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे. असेच खोदकाम आर्वी मार्गावर केळकरवाडी परिसरात सुरू असताना अचानक जंक्शन जलवाहिनी फूटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. सदर बाब न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्या लक्षात येताच तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या ४८ तासात दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांंकडून व्यक्त केला जात आहे.वर्धा शहरातील नागरिकांना धामनदीच्या येळाकेळी आणि पवनार येथील पात्रातून पाण्याची उचल करून पाणी पुरवठा केल्या जातो. वर्धा शहरात सध्या अमृत योजनेंतर्गत ठिकठिकाणी भूमिगत गटारवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. असेच खोदकाम काम सुरू असताना स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आर्वी मार्गावर सुरू असताना अचानक जलवाहिनी फुटली. परिणामी, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. विशेष म्हणजे फुटलेली जलवाहिनीही जंक्शन लाईन असून ती फार पूर्वी टाकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर १९९८ पासून तिचे मेंटेनेन्सचे काम निघाले नव्हते. न.प.तील जुन्या कर्मचाºयांकडून या परिसरात जलवाहिनी असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, खोदकाम करताना सुमारे १० मीटरचा अंदाज चुकला. उल्लेखनिय म्हणजे पूर्वीच्या जलवाहिनीचा कुठलाही नकाशा नगर परिषदेकडे नसल्याचे सांगण्यात आले. पूर्वीच शहरातील नागरिकांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो.

टॅग्स :Waterपाणी