शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विकासाच्या नावावर विनाशाला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:18 IST

अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.

ठळक मुद्देमाला माथुर : जाजू महाविद्यालयात तपोधन श्रीकृष्णदास जाजू जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाने जो विकास साधला आह, हा काही चमत्कार नाही. त्यासाठी अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पुरूषोत्तम कालभूत होते. डॉ.उल्हाज जाजू, उपप्राचार्य प्रा.सुरेश पवार प्रामुख्याने उपस्थित होते. माला माथुर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा. या स्पर्धात्मक युगात दुसऱ्याशी स्पर्धा करून वाईट विचारांचा मनात शिरकाव करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. कालच्यापेक्षा आजचा दिवस कसा चांगला जाईल, याचा प्रयत्न करा. समर्पित भावनेने आपले जीवन व्यथित करा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तपोधन श्रीकृष्णदास जाजू हे माझे आजोबा होते. यावेळी डॉ.उल्हास जाजू यांनीसुद्धा मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.पुरूषोत्तम कालभूत यांनी तपोधन जाजू यांच्या कार्याचा वसा घेण्याचे आवाहन केले. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ यानुसार आपले कार्य असले पाहिजे. महात्मा गांधी आणि तपोधन जाजू यांचे कार्य असे होते. महात्मांच्या विचारावरच ते चालले, कारण त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत. याच विचारांच्या बळामुळे आपण यशस्वी होऊ शकतो, असेही डॉ.कालभूत म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. मिलिंद माने यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. सलीम शेख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Socialसामाजिक