शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

विकासाच्या नावावर विनाशाला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:18 IST

अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.

ठळक मुद्देमाला माथुर : जाजू महाविद्यालयात तपोधन श्रीकृष्णदास जाजू जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाने जो विकास साधला आह, हा काही चमत्कार नाही. त्यासाठी अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पुरूषोत्तम कालभूत होते. डॉ.उल्हाज जाजू, उपप्राचार्य प्रा.सुरेश पवार प्रामुख्याने उपस्थित होते. माला माथुर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा. या स्पर्धात्मक युगात दुसऱ्याशी स्पर्धा करून वाईट विचारांचा मनात शिरकाव करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. कालच्यापेक्षा आजचा दिवस कसा चांगला जाईल, याचा प्रयत्न करा. समर्पित भावनेने आपले जीवन व्यथित करा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तपोधन श्रीकृष्णदास जाजू हे माझे आजोबा होते. यावेळी डॉ.उल्हास जाजू यांनीसुद्धा मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.पुरूषोत्तम कालभूत यांनी तपोधन जाजू यांच्या कार्याचा वसा घेण्याचे आवाहन केले. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ यानुसार आपले कार्य असले पाहिजे. महात्मा गांधी आणि तपोधन जाजू यांचे कार्य असे होते. महात्मांच्या विचारावरच ते चालले, कारण त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत. याच विचारांच्या बळामुळे आपण यशस्वी होऊ शकतो, असेही डॉ.कालभूत म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. मिलिंद माने यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. सलीम शेख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Socialसामाजिक