शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

निवडणूक काळात सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरणास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:45 IST

निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचे निर्देश : लेखी परवानगीशिवाय भिंत रंगविणे ठरेल गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे.निवडणूक काळात राजकीय पक्षांचे व उमेदवारांचे कार्यकर्ते खासगी व सार्वजनिक इमारतींच्या भिंतीवर निवडणूक विषयक भिंतीपत्रके चिकटवून घोषणा लिहून, निवडणूक चिन्हे रंगविण्यासाठी भिंतीचा उपयोग करतात. तसेच या गोष्टी इमारतींच्या मालकांची परवानगी न घेताच केल्या जातात व त्यांना त्या अतिशय त्रासदायक ठरतात. याबाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा, १९८४ व तसेच खासगी वा सरकारी मालमत्ता विद्रुपन कायदा, १९९६ अन्वये तरतुदी पुरेशा परिणामकारक आहेत. अशा प्रकारची अनिष्ट कृत्ये करणाऱ्या पक्षांविरूध्द/ व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपिकरणासंदर्भात पत्रा अन्वये केली आहे.निवडणूक सुरू असलेल्या कालावधीत राजकीय पक्ष वा उमेदवार यांनी त्यांच्या अनुयायांना चिन्हे लावणे, फलक लावणे, नोटीसा चिकटवणे व घोषणा लिहिणे आदींसाठी खासगी जमीन, इमारती, भिंतीचा मालकांच्या लेखी परवानगीशिवाय वापर करण्यास अनुमती देता कामा नये. तसेच राजकीय पक्ष वा उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते यांना कोणत्याही सार्वजनिक इमारतींवर आपली भिंतीपत्रके चिकटवणे, घोषणा लिहिणे, आपली निवडणूक चिन्हे रंगविणे अशाप्रकारे विद्रुपित करण्याचे अधिकार नाहीत.पोस्टर, बॅनर आदीबाबत परवानगी, जाहीर प्रचाराचा कालावधी संपेपर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येईल.जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सदर साहित्य संबंधित उमेदवार/ पक्षांनी तात्काळ काढून टाकणे आवश्यक राहील, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जर त्यांनी असे प्रचार साहित्य जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर काढले नाही तर त्याबाबत उपरोक्त मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व असे प्रचार साहित्य त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने काढून टाकावे आणि ते साहित्य काढण्याकरिता आलेल्या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये करावा, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.जुना काळ गेलावर्धा लोकसभा मतदार संघात माकपकडून अनेक निवडणूका लढलेले रामचंद्रकाका घंगारे यांचा प्रचार शहरी व ग्रामीण भागात प्रचार भिंती रंगवून केला पूर्वी केला जात होता. काकाचे शेकडो अनुयायी निवडणूक जाहीर झाली की कामाला लागून जायचे आजही शहराच्या काही भागात या भिंती इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.