शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

निवडणूक काळात सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरणास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:45 IST

निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचे निर्देश : लेखी परवानगीशिवाय भिंत रंगविणे ठरेल गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे.निवडणूक काळात राजकीय पक्षांचे व उमेदवारांचे कार्यकर्ते खासगी व सार्वजनिक इमारतींच्या भिंतीवर निवडणूक विषयक भिंतीपत्रके चिकटवून घोषणा लिहून, निवडणूक चिन्हे रंगविण्यासाठी भिंतीचा उपयोग करतात. तसेच या गोष्टी इमारतींच्या मालकांची परवानगी न घेताच केल्या जातात व त्यांना त्या अतिशय त्रासदायक ठरतात. याबाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा, १९८४ व तसेच खासगी वा सरकारी मालमत्ता विद्रुपन कायदा, १९९६ अन्वये तरतुदी पुरेशा परिणामकारक आहेत. अशा प्रकारची अनिष्ट कृत्ये करणाऱ्या पक्षांविरूध्द/ व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपिकरणासंदर्भात पत्रा अन्वये केली आहे.निवडणूक सुरू असलेल्या कालावधीत राजकीय पक्ष वा उमेदवार यांनी त्यांच्या अनुयायांना चिन्हे लावणे, फलक लावणे, नोटीसा चिकटवणे व घोषणा लिहिणे आदींसाठी खासगी जमीन, इमारती, भिंतीचा मालकांच्या लेखी परवानगीशिवाय वापर करण्यास अनुमती देता कामा नये. तसेच राजकीय पक्ष वा उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते यांना कोणत्याही सार्वजनिक इमारतींवर आपली भिंतीपत्रके चिकटवणे, घोषणा लिहिणे, आपली निवडणूक चिन्हे रंगविणे अशाप्रकारे विद्रुपित करण्याचे अधिकार नाहीत.पोस्टर, बॅनर आदीबाबत परवानगी, जाहीर प्रचाराचा कालावधी संपेपर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येईल.जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सदर साहित्य संबंधित उमेदवार/ पक्षांनी तात्काळ काढून टाकणे आवश्यक राहील, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जर त्यांनी असे प्रचार साहित्य जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर काढले नाही तर त्याबाबत उपरोक्त मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व असे प्रचार साहित्य त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने काढून टाकावे आणि ते साहित्य काढण्याकरिता आलेल्या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये करावा, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.जुना काळ गेलावर्धा लोकसभा मतदार संघात माकपकडून अनेक निवडणूका लढलेले रामचंद्रकाका घंगारे यांचा प्रचार शहरी व ग्रामीण भागात प्रचार भिंती रंगवून केला पूर्वी केला जात होता. काकाचे शेकडो अनुयायी निवडणूक जाहीर झाली की कामाला लागून जायचे आजही शहराच्या काही भागात या भिंती इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.