शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:39 IST

माणिकवाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला आहे. घाणीत असलेल्या टाकीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले आहे.

ठळक मुद्देडासांचा प्रादुर्भाव : माणिकवाडा ग्रां.प.मध्ये सावळागोंधळ, नालीतील सांडपाणी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : माणिकवाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला आहे. घाणीत असलेल्या टाकीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले आहे. पाणी सोडणाºया व्हॉल्व्हमध्ये घाण असल्याने दूषित पाणी नळांना जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गावातील नालीमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. याची कल्पना देवूनही ग्रामपंचायत मात्र काहीही लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.माणिकवाडा गावात सार्वजनिक चौक व मोकळी जागा आहे. गावातील मुख्य बसस्थानक परिसरात असलेली पाणीपुरवठा टाकी पूर्णत: असुरक्षित आहे. टाकीच्या सभोवताल असलेले तारेचे कुंपन तुटलेले आहे. लोखंडी फाटक असून त्याला कुलूप लावल्या जात आहे. पाणी सोडण्यासाठी असलेले व्हॉल्व्ह घाणीने माखले आहे. त्यात दूषित पाणी आहे. सर्र्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे. व्हॉल्व्हकरिता बांधलेल्या टाक्याही घाणीत आहे. शिवाय सांडपाणी सार्वजनिक रस्त्यावरून वाहत आहे. आरोग्य उपकेंद्रासमोरची नाली बुजून पाणी इतरत्र वाहत होते. यात डास निर्माण होत आहे. या त्रासापोटी नाला उपसण्याची मागणी तेथील परिचारीकेने ग्रामपंचायतला दिली. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील नाल्या तुंबल्या असून शेखणताचे ढिगारे उघड्यावर आहे. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.मनरेगामधून काम मिळेनारोजगार हमी योजनेमधून गावकरी रोजगार मागत आहे. त्यांना काम देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. मजुरीचे मस्टरही काढल्या जात नाही. रोजगारसेवक मजुरांना त्रास देतो त्याच्यावर कारवाई केल्या जात नाही. रोजगार सेवक मजुरांना त्रास देतो त्याच्यावर कारवाई केल्या जात नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागीतल्यावरही देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे.