शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

वन्यप्राण्यांचा हैदोस, उभ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:53 IST

चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहेत. शेतातील उभे असलेले कपाशी, तुर, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांना जमीनदोस्त करीत आहे.

ठळक मुद्देबंदोबस्त करा : तुरीची ओळच खाऊन फस्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहेत. शेतातील उभे असलेले कपाशी, तुर, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांना जमीनदोस्त करीत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.जंगली श्वापद हे खातो कमी व उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो तसेच माकड सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. सदर प्राणी उभ्या झाडांना मोडून कपाशीचे बोंडे, तुरीच्या शेंगा खातात. झाड मोडल्यामुळे त्या झाडांना आणारे बोंडे व शेंगा वाळून जातात. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतीला लावलेला खर्च निघते की नाही हाच प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे.जागली जाव तर सरपटणाºया प्राण्यांचा धाक, सरपटणाºया प्राण्यांमुळे बरेच शेतकरी मृत्यूमुखी पडलेत आणि तारांच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडण्यास वन विभागाची मनाई तर आम्ही वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण कसे करावे असाही प्रश्न परिसरातील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. आहे. बरेचदा नुकसान मोठे व भरपाई कमी असा प्रकार घडतो. त्यामुळे आर्थिक संकट शेतकºयांवर येते.वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे उत्पन्नात चांगलीच घट येऊ शकते. याकरिता संबंधीत विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.विजय बेलसरे, शेतकरी, जामणी (चिकणी)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती